Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > शेतकरी बांधवांनो कर्जमाफीचा लाभ हवा! तर 'या' कागदपत्राचे आजच प्रमाणीकरण करा

शेतकरी बांधवांनो कर्जमाफीचा लाभ हवा! तर 'या' कागदपत्राचे आजच प्रमाणीकरण करा

Farmers, if you want the benefit of loan waiver! Then get this document authenticated today | शेतकरी बांधवांनो कर्जमाफीचा लाभ हवा! तर 'या' कागदपत्राचे आजच प्रमाणीकरण करा

शेतकरी बांधवांनो कर्जमाफीचा लाभ हवा! तर 'या' कागदपत्राचे आजच प्रमाणीकरण करा

karj mafi update राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने'त शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यतची कर्जमाफी, तर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

karj mafi update राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने'त शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यतची कर्जमाफी, तर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने'त शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, तर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र शासनाने २०२६-२७च्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे.

या अंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाईल. या योजनेमुळे राज्यातील सुमारे ३५ ते ४० लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

दीड लाख शेतकऱ्यांचे १,४०० कोटींचे कर्ज माफ
◼️ राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने'त शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यतची कर्जमाफी होणार आहे.
◼️ नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
◼️ दीड लाख शेतकऱ्याचे १,४०० कोटी कर्ज माफ होणार आहेत.
◼️ योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करणे अनिवार्य आहे. हे केले नाहीतर कर्जमाफी मिळणार नाही.

कर्जमाफीसाठी निकष आणि अटी-शर्ती
◼️ सप्टेंबर २०२५ अखेर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होऊ शकते.
◼️ साधारणपणे ३० सप्टेंबर २०२५ (किंवा काही ठिकाणी ३० जून २०२६ पर्यंतच्या अतिवृष्टी बाधित) कर्जाचा विचार केला जाऊ शकतो.
◼️ ही योजना प्रामुख्याने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी असेल.
◼️ नियमित कर्जदारांसाठी ५०,००० रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा असा लाभ
◼️ थकीत कर्जदार : थकीत कर्जदार असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.
◼️ नियमित कर्जदार : वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

कसे करायचे आधार प्रमाणीकरण?
◼️ आधार प्रमाणीकरण ही तुमची ओळख पटवण्याची प्रक्रिया आहे, जी ओटीपी, फिंगरप्रिंट किंवा आयरीस स्कॅनद्वारे केली जाते.
◼️ अ‍ॅग्रीस्टॅकवर नोंदणी करणे आता अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी 'फार्मर आयडी' बंधनकारक करण्यात आला आहे.

अधिक वाचा: द्राक्ष शेतीतून नगर जिल्ह्यातील 'हे' गाव झालं करोडपती; जमिनीचा दर चाललाय एकरी ५० ते ६० लाख रुपये

Web Title : किसानों, ऋण माफी लाभ के लिए आज ही दस्तावेज़ सत्यापित करें!

Web Summary : महाराष्ट्र की ऋण माफी योजना पात्र किसानों को ₹2 लाख तक और समय पर पुनर्भुगतान करने वालों को ₹50,000 तक प्रदान करती है। आधार सत्यापन अनिवार्य है। लगभग 35-40 लाख किसानों को इस पहल से लाभ होने की उम्मीद है, जिसमें 1.5 लाख किसानों के लिए ₹1,400 करोड़ पहले ही माफ कर दिए गए हैं।

Web Title : Farmers, Verify Documents Today for Loan Waiver Benefit!

Web Summary : Maharashtra's loan waiver scheme offers up to ₹2 lakh for eligible farmers and ₹50,000 for timely repayments. Aadhaar verification is mandatory. Approximately 35-40 lakh farmers are expected to benefit from this initiative, with ₹1,400 crore already waived for 1.5 lakh farmers.