Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात तब्बल ३७ हजार हेक्टरवरील पिकांची झाली माती; आजपासून पंचनाम्यांना सुरुवात

राज्यात तब्बल ३७ हजार हेक्टरवरील पिकांची झाली माती; आजपासून पंचनाम्यांना सुरुवात

Crops on 37 thousand hectares in the state have been destroyed; Panchnamas start from today | राज्यात तब्बल ३७ हजार हेक्टरवरील पिकांची झाली माती; आजपासून पंचनाम्यांना सुरुवात

राज्यात तब्बल ३७ हजार हेक्टरवरील पिकांची झाली माती; आजपासून पंचनाम्यांना सुरुवात

राज्यात गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई वगळता राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये या पावसाने धुमाकूळ घातला आहे.

राज्यात गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई वगळता राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये या पावसाने धुमाकूळ घातला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : राज्यात गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई वगळता राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये या पावसाने धुमाकूळ घातला आहे.

या पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्याला बसला असून येथील सुमारे साडेबारा हजार हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कृषी सहायकांनी काम बंद आंदोलन स्थगित केल्यामुळे आता पंचनाम्यांना आता वेग येईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यभरात जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)
धुळे - ६४५
नंदुरबार - १०५
बुलढाणा -  ५,७३७
अमरावती - १२,५६५
नागपूर - ४२
भंडारा - ३८५
पालघर - ७९६
नाशिक - ३,४५३
अकोला - ९०९
गोंदिया - १४३
ठाणे - १
अहिल्यानगर - १,२१५
बीड - १०
यवतमाळ - २९०
गडचिरोली - ३४२
वाशिम - २२४ 
जालना - १,७२६
परभणी - ३३८
हिंगोली - ६०
धाराशिव - १२५
नांदेड -  ७
लातूर - ४,०८५
रायगड - ४२
पुणे - ६७६
रत्नागिरी - १
सातारा - ७३
सोलापूर - १,६६६
एकूण - ३७,८०६

या पिकांची झाली माती
पावसामुळे फळबागा, भाजीपाला तसेच कांदाबाजरी पिकाला फटका बसला. कृषी विभागानुसार राज्यात चार मे ते २७ मे या काळात ३७ हजार ८०६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत कृषी सहायकांच्या मागण्या मान्य झाल्याने बुधवारपासून पंचनामे करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा: शेतजमिन वाटणीपत्राच्या दस्त नोंदणीस लागणारी फी माफ; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

Web Title: Crops on 37 thousand hectares in the state have been destroyed; Panchnamas start from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.