छोट्याशा ब्रेकनंतर वत्सल सेठने पुन्हा सुरू केले हासिलचे चित्रीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 11:19 AM2017-12-06T11:19:07+5:302017-12-06T16:56:59+5:30
वत्सल सेठ आणि इशिता दत्ता या दोघांनी रिश्तों का सौदागर-बाजीगर या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेच्या सेटवर ...
व ्सल सेठ आणि इशिता दत्ता या दोघांनी रिश्तों का सौदागर-बाजीगर या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांनी नुकतेच लग्न केले. या दोघांच्या लग्नाला वत्सल आणि इशिताचे मित्र आणि नातेवाईक हजर होते. याशिवाय अजय देवगण, काजोल, बॉबी देओल आणि टॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली. लग्नानंतर लगेच वत्सल आणि इशिता हनिमूनसाठी सिंगापूरला रवाना झाले.
वत्सल सेठ सध्या हासिल या मालिकेत कबीर रायचंद या एका श्रीमंत उद्योजकाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेत तो महत्त्वाची भूमिका साकारत असल्याने त्याला जास्त दिवसांचा ब्रेक घेणे शक्य नव्हते. त्यामुळे आता वत्सल सिंगापूरवरून भारतात परतला असून त्याने त्याच्या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. वत्सलने पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली हे कळल्यावर अनेकजण त्याला फोन करत होते आणि शुभेच्छा, भेटवस्तू याची त्याच्यावर बरसात करत आहेत. त्यामुळे ब्रेकनंतरचा चित्रीकरणाचा त्याचा पहिला दिवस खूपच चांगला गेला. याविषयी वत्सल सांगतो, चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात केल्यामुळे मी खूप खूश आहे. माझ्या विवाहबद्दल मालिकेच्या टीममधील खूपच कमी जणांना माहीत होते. त्यामुळे त्यांच्यासाठी तो एक आश्चर्याचा धक्का होता. मी परत आल्यावर सगळेजण भेटून मला शुभेच्छा देत आहे. मी आणि इशिता दोघेही कामात प्रचंड व्यग्र असल्याने आम्ही खूपच कमी दिवसांत सिंगापूरवरून परतलो. सेटवरचा पहिला दिवस हा खूप धकाधकीचा होता. पण तरीही सेटवर मला खूप मजा आली. झायद खान आणि निकिता दत्ता यांनी माझे खूपच चांगल्या प्रकारे स्वागत केले. हासिल ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची मालिका आहे. त्याचे कथानक खूपच चांगले आहे. प्रेक्षक या मालिकेचे आणि आमच्या कामाचे कौतुक करत आहेत. त्यांनी आजवर दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचा आभारी आहे. माझ्यावर आणि इशितावर प्रेम आणि सदिच्छांचा वर्षाव केल्याबद्दल आम्ही भारावून गेलो आहोत आणि सर्वांचे ऋणी आहोत.
Also Read : हासिल या मालिकेच्या सेटवर वत्सल सेठ बनला चायवाला
वत्सल सेठ सध्या हासिल या मालिकेत कबीर रायचंद या एका श्रीमंत उद्योजकाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेत तो महत्त्वाची भूमिका साकारत असल्याने त्याला जास्त दिवसांचा ब्रेक घेणे शक्य नव्हते. त्यामुळे आता वत्सल सिंगापूरवरून भारतात परतला असून त्याने त्याच्या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. वत्सलने पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली हे कळल्यावर अनेकजण त्याला फोन करत होते आणि शुभेच्छा, भेटवस्तू याची त्याच्यावर बरसात करत आहेत. त्यामुळे ब्रेकनंतरचा चित्रीकरणाचा त्याचा पहिला दिवस खूपच चांगला गेला. याविषयी वत्सल सांगतो, चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात केल्यामुळे मी खूप खूश आहे. माझ्या विवाहबद्दल मालिकेच्या टीममधील खूपच कमी जणांना माहीत होते. त्यामुळे त्यांच्यासाठी तो एक आश्चर्याचा धक्का होता. मी परत आल्यावर सगळेजण भेटून मला शुभेच्छा देत आहे. मी आणि इशिता दोघेही कामात प्रचंड व्यग्र असल्याने आम्ही खूपच कमी दिवसांत सिंगापूरवरून परतलो. सेटवरचा पहिला दिवस हा खूप धकाधकीचा होता. पण तरीही सेटवर मला खूप मजा आली. झायद खान आणि निकिता दत्ता यांनी माझे खूपच चांगल्या प्रकारे स्वागत केले. हासिल ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची मालिका आहे. त्याचे कथानक खूपच चांगले आहे. प्रेक्षक या मालिकेचे आणि आमच्या कामाचे कौतुक करत आहेत. त्यांनी आजवर दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचा आभारी आहे. माझ्यावर आणि इशितावर प्रेम आणि सदिच्छांचा वर्षाव केल्याबद्दल आम्ही भारावून गेलो आहोत आणि सर्वांचे ऋणी आहोत.
Also Read : हासिल या मालिकेच्या सेटवर वत्सल सेठ बनला चायवाला