​हा अभिनेता त्याच्या स्ट्रगलच्या दिवसामध्ये राहात असे गुरुद्वारामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 11:00 AM2017-10-25T11:00:16+5:302017-10-25T16:30:16+5:30

शंशाक व्यासला बालिकावधू या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्याने साकारलेली जग्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या भूमिकेमुळे ...

In the gurdwara, the actor lives in his stern days | ​हा अभिनेता त्याच्या स्ट्रगलच्या दिवसामध्ये राहात असे गुरुद्वारामध्ये

​हा अभिनेता त्याच्या स्ट्रगलच्या दिवसामध्ये राहात असे गुरुद्वारामध्ये

googlenewsNext
शाक व्यासला बालिकावधू या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्याने साकारलेली जग्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या भूमिकेमुळे प्रेक्षकांनी शशांकला अक्षरशः डोक्यावर घेतले. या मालिकेनंतर त्याने जाना ना दिल से दूर या मालिकेतही काम केले. आज शशांकने छोट्या पडद्यावर चांगले नाव कमावले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, इथपर्यंत पोहोचण्यासाठी शशांकला खूप स्ट्रगल करावा लागला. शशांक हा मुळचा उज्जैनचा आहे. त्याला अभिनय क्षेत्रात करियर करायचे असल्याने तो मुंबईत आला. पण मुंबईत आल्यानंतर त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.

shashank vyas

शशांक व्यासने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांविषयी सांगितले आहे. त्याने म्हटले आहे की, मी २००९ मध्ये उज्जैनहून मुंबईला आलो. मुंबईत माझा एक मित्र राहात होता. तो मला मदत करेल याची मला खात्री होती. त्यामुळे मी मुंबईला येतो असे त्याला कळवले होते. दादर स्टेशनला मी ट्रेनमधून उतरलो आणि त्याला मी फोन केला तर त्याने माझे फोन उचललेच नाही. त्यामुळे आता काय करायचे हा मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा होता. मी काही दिवस अंधेरीतील एका गुरूद्वारामध्ये राहिलो. तिथे दिवसाला मला ३० रुपये द्यावे लागत असे. तिथे जो पहिला येईल त्यालाच झोपायला बेड मिळत असे. मुंबईत आल्यावर अनेक रात्री मी टेन्शनमध्ये घालवल्या आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण १८ महिन्यात मी जवळजवळ २७५ ऑडिशन दिल्या आहेत. मी मुंबईत असताना माझ्या आयुष्यात अतिशय दुःखद घटना घडली. माझ्या आईचे निधन झाले. त्यामुळे मी काही दिवसांसाठी उज्जैनला परतलो. काहीही करून अभिनेता बनायचे असे ठरवूनच मी पुन्हा मुंबईला आलो. त्याच दरम्यान मला रिश्ता डॉट कॉम या मालिकेत छोटीशी भूमिका साकारायला मिळाली. त्यानंतर काहीच महिन्यात बालिका वधू या मालिकेतील जग्या ही भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली आणि माझे संपूर्ण आयुष्यच या मालिकेमुळे बदलून गेले. माझ्या आईच्या आशीर्वादामुळेच मला आज हे य़श मिळवता आले आहे असे मला नेहमीच वाटते. 

Also Read : ​शशांकने हे काय केले?

Web Title: In the gurdwara, the actor lives in his stern days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.