Confirm : आता कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणार ‘हे’ तीन कॉमेडियन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 03:51 PM2017-03-23T15:51:24+5:302017-03-23T21:24:57+5:30

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला ‘द कपिल शर्मा कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो’ सध्या प्रचंड वादाच्या भोवºयात सापडला आहे. कपिलने शोमधील ...

Confirm: Kapil Sharma will now be seen in the show 'O' three comedians !! | Confirm : आता कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणार ‘हे’ तीन कॉमेडियन!!

Confirm : आता कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणार ‘हे’ तीन कॉमेडियन!!

googlenewsNext
ट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला ‘द कपिल शर्मा कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो’ सध्या प्रचंड वादाच्या भोवºयात सापडला आहे. कपिलने शोमधील त्याचा सहकारी सुनील ग्रोव्हर याला मारपीट करीत चंदन प्रभाकर याच्यासोबत हुज्जत घातल्याने या दोघांनी शोपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच जज म्हणून असलेले नवज्योत सिंग सिद्धू यांनीही पंजाबच्या मंत्री पदाच्या जबाबदारीचे कारण पुढे करीत शोमधून काढता पाय घेतल्याने शोविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते; मात्र आता पुढे आलेल्या माहितीनुसार सुनील आणि चंदनला रिप्लेस म्हणून तीन नव्या कलाकारांना शोमध्ये एंट्री दिली आहे. 



सूत्रानुसार निर्मात्यांनी सुनील पाल, राजू श्रीवास्तव आणि एहसान कुरेशी या तीन कॉमेडी कलाकारांना एंट्री दिली असून, त्यांच्यासोबत एक एपिसोडही शूट करण्यात आला आहे. या तिघांच्या एंट्रीमुळे शोला वेगळेच वळण मिळाल्याने, येत्या काळात सुनील ग्रोव्हर आणि कपिलमधील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान सुनील पालने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही एक एपिसोड शूट केला असून, त्याच्या प्रसारणानंतरच पुढच्या वाटचालीविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे. जेव्हा सुनील पालला सुनील ग्रोव्हरबाबत कपिलने केलेल्या घटनेवरून विचारण्यात आले तेव्हा त्याने हसत म्हटले की, सर्व मीडिया मला असे समजत आहे की, जणू काही मीच त्याला शो सोडण्यास भाग पाडले. तसेच सुनील पालने शोविषयी बोलताना म्हटले की, शोमध्ये माझी नेमकी काय भूमिका असेल हे अद्यापपर्यंत निश्चित नाही. 



राजू श्रीवास्तव, एहसान कुरेशी आणि मला गेल्या दोन दिवसांपूर्वीच २१ मार्चला एपिसोड शूट करण्यासाठी बोलविण्यात आले होते. आम्ही तिघांनी पहिला एपिसोड स्टॅँडप कॉमिडीयन म्हणून शूट केला. हा एपिसोड कपिल शर्माच्या टीमला पसंत आला आहे. यावेळी सुनील पालने त्याच्या पहिल्या एपिसोडच्या शूटिंगचे काही अनुभवही कथन केले. तो म्हणाला की, पहिल्याच एपिसोडमध्ये खूप धमाल करायला मिळाली. माझ्या माहितीनुसार सध्या तरी सुनील आणि चंदन यांनी हा शो सोडला आहे. मात्र अशातही शोची टीम या सुनील ग्रोव्हर आणि चंदनला परत आणण्याबाबत आशावादी असल्याचे त्याने सांगितले. 



सुनील पालने हेही सांगितले की, कपिल माझा आदर करीत असून, तो वारंवार म्हणतो की, मी त्याचा गुरू आहे. तसेच कपिल आणि सुनील गोव्हरबाबतच्या संबंधांविषयी जर विचारत असाल तर मला त्यांच्यातील नात्याविषयी काहीच माहीत नाही. कपिलचा शो एका परिवारासारखा आहे. त्यामुळे परिवारात अशा घटना होत असता. मला असे वाटते की, काही कलाकारांनी सुनील आणि चंदनचे कान भरले असावेत. त्यामुळे हा वाद विचारांमधील मतभेदांमुळे उफाळत असल्याचेही सुनील पाल याने सांगितले. 



काही दिवसांपूर्वी आॅस्ट्रेलिया येथे शो परफॉर्मन्स केल्यानंतर परतत असलेल्या कपिलच्या टीममध्ये प्रचंड वाद झाला होता. यावेळी कपिलने सुनील गोव्हर आणि चंदनला मारपीट करताना शिवीगाळ केली होती. त्यानंतर कपिलने ट्विटरच्या माध्यमातून सुनील ग्रोव्हरची माफीही मागितली होती. यावेळी सुनीलने कपिलला उत्तर देताना म्हटले होते की, माणुसकी लक्षात ठेव, स्वत:ला देव समजू नकोस असा सल्ला दिला होता. त्यानंतर दोघांमधील वाद असा काही उफाळला की, या सुनीलसह चंदननेही शो सोडण्याचा निर्णय घेतला. आता येत असलेल्या माहितीनुसार इतरही कलाकार शोमधून बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत आहेत. 

Web Title: Confirm: Kapil Sharma will now be seen in the show 'O' three comedians !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.