Next

इथे ओशाळतो मृत्यू! जीर्ण इमारतीतील लोकांचं जीवघेणं वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 01:19 PM2019-07-30T13:19:08+5:302019-07-30T13:21:11+5:30

मुंबई - चुनाभट्टी या विभागातील टाटा नगर येथे असलेलीच स्वदेशी मिल बंद पडून १९ वर्षे उलटली आहेत. मात्र येथील ...

मुंबई - चुनाभट्टी या विभागातील टाटा नगर येथे असलेलीच स्वदेशी मिल बंद पडून १९ वर्षे उलटली आहेत. मात्र येथील १२३ गिरणी कामगारांचे कुटुंब ८० वर्षे जुनी मोडकळीस आलेल्या ४ मजली इमारतीत वास्तव्य करीत आहेत. या इमारतीची अवस्था बिकट असून जागोजागी सज्जे कोसळले आहेत. भिंती जीर्ण झालेल्या असून जिने देखील मोडकळीस आलेले आहेत. अशातच शाळकरी मुलं आणि रहिवाशांना जीव मुठीत घेऊन या इमारतीत राहावं लागत आहे.