तुम्हाला कधी असे होते का की सतत डोक्यात खाण्याचाच विचार असतो? जेवण झाल्यावर पोट भरलेले असतानाही थोड्या वेळाने काय खाऊ शकतो याचे नियोजन करण्यात मन रमवता? सोशल मिडियावर सतत फक्त खाण्याचेच व्हिडिओ तुम्ही पाहत असता. काम करताना काही तरी चविष्ट खाण्याची इच्छा होत राहते. काही वेळा तर जे हाताला लागेल ते खाल्ले जाते.(Constantly thinking about eating? Check out these 5 tips to avoid overeating, weight loss tips ) सतत अरबटचरबट खाण्याची तलप लागण्यामागे काही कारण असते का ? तर हो!! नक्कीच असते. वजन वाढत चाल्ले असतानाही तोंडावर ताबा राहत नाही. कितीही व्यायाम करा, जिमला जा तसेच योगासने करा. चालायला जा. सगळे केले तरी आहारावर नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे. काय खावे, किती खावे, कधी खावे, याचे भान ठेवणे फार महत्त्वाचे असते. तासभर चाललात व्यायाम केला आणि नंतर भरपूर साखर घातलेला चहा प्यायला की त्या व्यायामाचे कष्ट वायाच जातात. त्यामुळे जाणून घ्या खाण्यावर नियंत्रण कसे ठेवाल.
अन्न हा अत्यंत महत्त्वाचा घटक. खाणे बंद नाही करु शकत मात्र अति खाणे टाळायला हवे. क्रेविंग्जवर ताबा ठेवता आला की पोटाला आराम मिळेल आणि वजनही आटोक्यात राहील.
१. जेवताना जर तुम्ही पटपट व्यवस्थित न चावता जेवत असाल तर ते अन्न नीट पचत नाही. थोड्यावेळाने पुन्हा भूकही लागते. त्यामुळे जेवताना लहान घास घ्यायचा. जास्त चवायचा. गिळायचा नाही. हळू जेवायचे. जेवणाचा कालावधी वाढला की नंतर पुन्हा काही खावेसे वाटणार नाही.
२. सतत पाणी प्यायचे. गरम पाणी प्या, कोमट पाणी प्या. पाण्यात तुळशीची पाने घाला. बरेचदा शरीराला पाण्याची गरज असताना ताहान न लागता भूक लागते. त्यामुळे पाणी पिणे योग्य ठरेल. सतत खाणे टाळा.
३. कंटाळा, ताणतणाव, दुःख , चिंता, काम आदी मानसिक स्थितींमध्ये भूक लागते. ते अगदी नैसर्गिक आहे. असे जर तुम्हालाही होत असेल तर मन दुसरीकडे रमवायचे. वाचन करा. चालायला जा. तसेच मित्रांशी गप्पा मारा. मन दुसरीकडे रमल्यावर खाण्याचा विचार येणार नाही.
४. इंस्टाग्रामवर सतत खाण्याचे व्हिडिओ जर पाहत असाल तर त्यामुळेही भूक लागते. एखादा चविष्ट पदार्थ पाहिल्यावर तो खावासा वाटणे साहाजिक आहे. सतत खाण्यासंबंधी पोस्ट पाहत जाऊ नका. डोक्यात खाण्याचा विचार आलाच नाही तर भूक नाही लागत.
५. समोर दिसले म्हणून खाल्ले असे ही अनेकांचे असते. त्यामुळे घरात अरबटचरबट पदार्थ ठेऊच नहा. त्याऐवजी फळे , सुकामेवा असे पौष्टिक पदार्थ ठेवा. काही खावेसे वाटत असेल तर असे चांगले पदार्थ खा. त्याचा त्रास नाही होत .