Join us

भारताच्या 'या' शहरांत राहतात सगळ्यात जास्त लठ्ठ लोक! बघा तुमच्या शहराचं नाव तर नाही यादीत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2025 17:42 IST

Which Is The Most Obese Indian State: भारतातलं लठ्ठ लोकांचं शहर अशी ओळख होऊ पाहणारं ते शहर नेमकं काेणतं आहे बरं..

ठळक मुद्देप्रोसेस्ड फूडचे आहारातले वाढलेले प्रमाण आणि व्यायामाचा अभाव ही वजन वाढीची सगळ्यात प्रमुख दोन कारणं आहेत.

लठ्ठपणा भारतात खूप जास्त वाढत चालला आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी खूप जास्त बदलून गेल्या आहेत. पारंपरिक भारतीय पदार्थ कमी आणि वेगवेगळे नवनविन पदार्थ खाण्यावर आपला भर आहे. याशिवाय बदललेल्या जीवनशैलीमुळे झालेला सगळ्यात मोठा बदल म्हणजे बैठ्या कामाचे स्वरुप वाढले असून शारिरीक हालचाली किंवा कष्टाची कामे, अंगमेहनतीची कामे खूप कमी झाली आहेत. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे भारतात स्थुलपणा वाढत चालला आहे. याविषयी नुकतंच एक सर्व्हेक्षण करण्यात आलं असून त्यामध्ये भारतातल्या कोणत्या शहरात जास्त लठ्ठ लोक राहतात हे शोधून काढण्यात आलं आहे..(which is the most obese Indian state? nearly 50% population affected)

 

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे यांच्यावतीने एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये अनेक मोठ्या संस्थांचे अभ्यासक सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांनी ६.३ लाखांपेक्षा जास्त कुटूंबांचा आणि जवळपास साडेसात लाख व्यक्तींचा अभ्यास केला.

Axiom Mission-4 : शुभांशू शुक्ला अंतराळात करणार मेथी, मूग उगविण्याचा प्रयत्न

यामध्ये त्यांना असं आढळून आलं की सर्वसामान्यपणे भारतामध्ये २० टक्के घरातील प्रौढ व्यक्तींचे वजन गरजेपेक्षा जास्त असून त्यातले १० टक्के लोक लठ्ठ आहेत. पण पाँडीचेरीमध्ये मात्र हे प्रमाण खूप जास्त असून तिथे जवळपास ४६ टक्के घरांमधल्या प्रौढ व्यक्ती लठ्ठ आहेत. त्यामुळेच अभ्यासानुसार सध्यातरी या प्रांतामध्ये सगळ्यात जास्त लठ्ठ लोक राहतात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

 

पाँडीचेरीनंतर तामिळनाडू, पंजाब, केरळ, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांचा क्रमांक येतो. तेथील लोकांमध्ये स्थुलतेचे प्रमाण ३० ते ४० टक्के एवढे नोंदविण्यात आलेले आहे.

चिकट, ड्राय झालेले केस महिनाभरात होतील सिल्की, मऊ! हेल्दी केसांसाठी सोपा घरगुती उपाय

प्रोसेस्ड फूडचे आहारातले वाढलेले प्रमाण आणि व्यायामाचा अभाव ही वजन वाढीची सगळ्यात प्रमुख दोन कारणं आहेत. या दोन्ही गोष्टींमध्ये थोडा बदल केला तर नक्कीच वाढत्या वजनावर ताबा येऊ शकतो आणि तब्येत चांगली राहू शकते.  

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्सअन्नव्यायाम