यावर्षी उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाल्यासारखं वातावरण झालं होतं. जवळपास १५ दिवस सगळीकडे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक जणांची उन्हाळी कामं राहून गेली. त्या उन्हाळी कामांपैकी एक म्हणजे घरातल्या विद्यूत उपकरणांची, विद्यूत वायरींगची नीट पाहणी करून घेणे आणि गरज वाटल्यास त्याची लगेचच दुरुस्ती करणे. कारण या दिवसांत घराच्या भिंतींमध्ये ओल मुरते. त्यामुळे वीजेचा शॉक बसण्याच्या कित्येक घटना घडतात. या घटनांमध्ये कित्येकांचा जीवही जातो. त्यामुळेच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच काही गोष्टींची खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे. त्या नेमक्या कोणत्या ते पाहा.. (The risk of electric shock increases during the monsoon)
पावसाळा सुरू होण्यापुर्वीच 'ही' कामं करून घ्या..
पावसाळ्याच्या दिवसांत सगळीकडे ओल आलेली असते. त्यामुळे आपल्या घरातल्या विजेवर चालणाऱ्या वस्तू वापरताना विशेष काळजी घ्यायला हवी.
आपल्या घरातील सगळ्या विद्यूत प्रवाहांचे अर्थिंग व्यवस्थित आहे की नाही, याची एकदा इलेक्ट्रिशियनकडून तपासणी करून घ्या.
कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या विजेच्या तारांचा वापर करू नका. तसेच विजेच्या खांबाला चिकटून उभे राहाणे, त्याला जोडून एखादे वाहन ठेवणे टाळा.
विजेवर चालणाऱ्या कोणत्याही वस्तूला पाणी तर लागत नाही ना याची एकदा खात्री करून घ्या.
ओल्या हाताने कोणतेही विद्यूत उपकरण हाताळू नका.
पावसाळ्यात बऱ्याच घरांमध्ये भिंतींना ओल येते. तुमच्या घरातही ज्या ठिकाणी स्विचबोर्ड आहे त्या भिंतीला ओल तर येत नाही ना हे एकदा तपासून घ्या.
घरात भाजीच नाही? २ कांदे घेऊन 'या' पद्धतीने करा भाजी- नेहमीपेक्षा खूपच वेगळी, चवदार होईल
गिझर, इस्त्री, पाण्याची मोटर या वस्तू वापरताना विशेष काळजी घ्या. त्यांचा प्लग ओला नाही ना, किंवा तुमचे हात ओले नाहीत ना, याची एकदा खात्री करून घ्या.
मोटार चालू बंद करताना पायात नेहमी स्लिपर असू द्या. कारण बहुतांश घरांमध्ये माेटार घराबाहेर असतात. त्याचे प्लग, बटण पावसाच्या पाण्याने ओले झालेले असते.
पाण्याची बाटली उघडा, बांगड्या भरून झाकण लावून टाका! बघा बँगल बॉक्स तयार करण्याचं देसी जुगाड
विद्युत मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून ती जागा ओली होत असल्यास ही समस्या लगेचच इलेक्ट्रिशियनला सांगावी आणि त्याच्याकडून मीटरची जागा बदलून घ्यावी.
घरातले वायरिंग जुने झाले असल्यास ते बदलून घ्यावे. पावसाळ्याच्या सुरुवातीला घरातल्या या काही वस्तूंची नीट तपासणी करणं खूप गरजेचं आहे.