पावसाळा सुरु झाला की सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसते. उष्ण प्रदेशातील लोकांसाठी तर पावसाचे थेंब म्हणजे अमृतच. उन्हाच्या झळांनी करपलेल्या वृक्षांसाठी हे पाणी वरदान आहे. पावसाचे पाणी साठवणे महत्त्वाचे असते. (During the rainy season, water accumulated in the house means the whole house falls ill with diseases! Empty the pots and buckets!)त्यासाठी विविध पद्धतींचा वापरही केला जातो. पावसाचे पाणी आपणही आपल्यापरिने साठवतच असतो. मात्र जे पाणी नको असतानाही साचते ते आरोग्यासाठी धोकादायक ठरते. पावसाळ्यात घराच्या परिसरात तसेच कोणत्याही लहान वस्तूतही पावसाचे पाणी साठते. हे पाणी खराब होते आणि त्यातून डासांचा जन्म होतो. पाण्यातील हे डास फार धोकादायक असतात. पावसाळ्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे विविध रोगराई पसरण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत आरोग्याच्या दृष्टीने योग्य उपाय करायलाच हवेत. पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते.
साचलेल्या पाण्यातून डासांची वाढ होते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारख्या अनेक आजारांचा फौलाव होतो. साथीचे आजार पसरतात. तसेच, दूषित पाण्यामुळे काविळ, टायफॉईड, कॉलरा यांसारखे जलजन्य रोगही पसरतात.या सगळ्या आजारांपासून वाचण्यासाठी पावसाळ्यात पाण्याचे योग्य नियोजन करायला हवेच.
१. सगळ्यात आधी जूनच्या सुरवातीलाच घराच्या आजूबाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करायला हवी. खड्डे मारणे, पाणी जाण्यासाठी वाट करणे तसेच कसले खोलगट तुकडे पडले असतील तर ते उचलणे अशा गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
२. घरी कुंडीत लावलेली रोपे असतील तर विशेष काळजी घ्यायला हवी. त्यात पाणी जास्त काळ साठणार नाही याची काळजी घ्यायची. दर काही दिवसांनी साफसफाई करायची. खराब पाणी वेळीच काढून टाकायचे. स्वच्छ पाणी ओतायचे.
३. कचऱ्याची योग्य सोय करावी. आवारात कचरा फेकू नये. तो पावसाळ्यात कुजतो आणि मग त्यातही कीडे तयार होतात. जिथे घाण तिथे रोगराई हा साधा नियम लक्षात ठेवायचा. परिसर अगदी स्वच्छ ठेवायचा.
४. पिंप, ड्रम यात साठवलेल्या पाण्यातही डास तयार होतात. त्यामुळे असे पाणी साठवणे टाळायला हवे. रोजच्या वापरायचे पाणी वेळोवेळी बदलायचे. साठवण्यासाठी वापरलेली वस्तू धुवायची. काळजी घेऊनही पाणी साचलेच तर त्यात घालण्यासाठी काही औषधे मिळतात. जवळच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवा. फवारणीसाठी सरकारी माणसे घरी येतात. असे केल्याने त्या पाण्यात अजिबात डास तयार होणार नाहीत.