1 / 5बहुतांश लोकांना असा अनुभव येतो की संध्याकाळी ४ ते ६ ची वेळ झाली की त्यावेळी खूप भूक लागल्यासारखं होतं. काहीतरी खावंसं वाटतं...2 / 5ही वेळ अशी असते की तेव्हा बहुतांश लाेक चहा किंवा काॅफी घेतात आणि त्यासोबतच बिस्किटे खातात. काही लोक फ्रेंच फ्राईज, वडापाव किंवा इतर काही तळलेले पदार्थ खातात. खरंतर अशावेळी हे सगळे तळलेले, मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतं. 3 / 5डॉक्टर असं सांगतात की संध्याकाळच्या वेळी तुम्हाला जी भूक लागते ती प्रामुख्याने शरीरातला वात वाढल्यामुळे लागते. दुपारी २ ते ६ हा वातकाळ असतो. या काळात शरीराची रुक्षता वाढत असते. 4 / 5शरीरातला वात वाढल्याने एनर्जी लेव्हल कमी झाल्यासारखी होते आणि काहीतरी खावंसं वाटतं. यालाच 'Cortisol Dip' असंही म्हणतात. अशावेळी नेमके चुकीचे पदार्थ पोटात गेले की वजन तर वाढतंच पण त्याचा परिणाम रात्रीच्या जेवणावर, रात्रीच्या झोपेवर होतो आणि हार्मोन्सचे संतुलनही बिघडते.5 / 5हे सगळं टाळायचं असेल तर संध्याकाळी एखादं फळ खाणं चांगलं. किंवा मग मखाना, राजगिरा, मुरमुरे, फुटाणे, साळीच्या लाह्या असे पदार्थ खाण्यास प्राधान्य द्यावं. यामुळे शरीराला पुरेसं पोषण मिळतं, एनर्जी येते आणि शिवाय वजनही वाढत नाही.