1 / 8वजन कमी करायचा प्रयत्न सध्या कित्येक जण करत आहेत. पण त्यापैकी सगळ्यांंचंच वजन कमी होतं असं नाही. यामागचं कारण एकच की त्यांचे प्रयत्न बऱ्याचदा चुकीच्या दिशेने चालू असतात.2 / 8सेलिब्रिटी डाएटीशियन पुजा माखिजा सांगतात की वजन कमी करायचं म्हणून कित्येकजण नाश्ता करणं टाळतात. पण इथेच त्यांची नेमकी चूक होते.3 / 8सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये माहिती देताना त्या सांगतात की नाश्ता करणं टाळल्याने शरीरावर नेमके काय परिणाम होतात याविषयी अनेक अभ्यास करण्यात आले. 4 / 8त्यातून असं लक्षात येतं की नाश्ता न करणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा, पोटाचा घेर वाढणे हे त्रास नाश्ता करणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त दिसत आहेत.5 / 8याचं कारण म्हणजे रात्रीपासून १० ते १२ तासांचा गॅप झाल्यानंतर शरीराला अन्नाची गरज असते. काही लोक भूक मारतात, पण नंतर मग दुपारी अगदी भरपेट जेवण करतात.6 / 8एकदम खूप खाल्ल्याने पचनक्रिया, मेटाबॉलिझम चांगलं होत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून वजन, पोट वाढत जातं.7 / 8शिवाय नाश्ता टाळल्याने कित्येकांना ॲसिडीटी, डोकेदुखी, चिडचिड होणे असेही त्रास होतात. त्यामुळे नाश्ता न टाळलेलाच बरा.8 / 8नाश्ता वेळेवर करा, पोटभर करा आणि तो जास्तीतजास्त पौष्टिक असेल असे बघा..