Join us

नावापुरते मित्र, कामाच्या वेळी गायब असे तर तुमचे मित्रमैत्रिणी नाहीत? ही घ्या टेस्ट-ओळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2025 13:47 IST

1 / 10
मैत्रीचे नाते फारच महत्त्वाचे असते. अशा गोष्टी असतात ज्या घरच्यांशी बोलू शकत नाही. अगदी प्रियकराशी ही बोलू शकत नाही. पण मित्र परिवाराला सांगू शकतो.
2 / 10
हे नातं फारच महत्त्वाचं आहे. पण आपण आपल्या दोस्तांना जेवढं महत्त्व देतो, तेवढं ते आपल्याला देतात का?
3 / 10
जर तुमचे मित्र तुम्हाला गृहीत धरत असतील तर, ते तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगले नाही. अशा मित्रांची लक्षणे जाणून घ्या.
4 / 10
तुमच्या आयुष्यात काय चालले आहे, यात त्यांना रस नाही. तुम्हाला ते महत्त्व देत नाहीत.
5 / 10
तुमच्या कोणत्याच कष्टांचे त्यांना कौतुक नसते. कधीच तुमचे वागणे त्यांना खास वाटत नाही. तुमच्या छोट्या-मोठ्या यशामध्ये त्यांना आनंद वाटत नाही.
6 / 10
तुम्ही त्यांच्या प्रत्येक दु:खात त्यांच्याबरोबर असता. पण तुम्हाला गरज असताना ते कधीच नसतात. त्यांच्यावर कधीच निर्भर राहता येत नाही.
7 / 10
तुम्ही मित्रांशी भांडलात किंवा कधी काही प्रसंग घडल्यानंतर, ते तुमच्याबद्दल विचार करत नाहीत. तुमची मैत्री तुटण्याबाबत त्यांना फारक पडत नाही.
8 / 10
तुमच्यासाठी मित्रांकडे कधीच वेळ नसतो. कधीही भेटायला, बोलायला ते नाहीच म्हणतात. काही ना काही कारणं देतात.
9 / 10
तुम्ही कोणत्याही गोष्टीला नकार देत नाही. तसे करायला घाबरता. कारण त्यांना तुमचं पटणारच नाही, याची तुम्हाला खात्री असते. तुमच्या मताला काहीच किंमत मित्र देत नाहीत.
10 / 10
असे मैत्रीचे नाते तुमच्यासाठी चांगले नाही. त्यांच्याशी संवाद साधा. तरी त्यांच्या वागण्यात बदल न झाल्यास त्या मैत्रीच्या नात्याला राहण्याला काही अर्थ नाही.
टॅग्स : रिलेशनशिपरिलेशनशिपमानसिक आरोग्यसामाजिक