By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:59 IST
1 / 9सकाळी उठल्यानंतर आळस येणं सामान्य आहे. आळसामुळे कधीकधी अंथरुणातून उठणं देखील कठीण होतं. यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा आणि उर्जेची कमतरता जाणवते. 2 / 9जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली केली तर तुम्हाला दिवसभर पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक वाटेल. २०-२०-२० रूल तुमचं जीवन बदलू शकतो. यामध्ये सकाळची वेळ वेगवेगळ्या कामांसाठी तीन भागांमध्ये विभागली जाते. हा रूल फॉलो केल्याने दिवसभर फ्रेश राहाल.3 / 9२०-२०-२० रूलनुसार, तुम्ही सकाळी उठून तुमचा वेळ २०-२०-२० मिनिटांमध्ये विभागला पाहिजे. पहिल्या २० मिनिटांत लाईट कार्डिओ वर्कआऊट, योगा किंवा वेगाने चाललं पाहिजे. 4 / 9तुमच्या हृदयाची गती वाढेल आणि तुम्हाला वर्कआऊटमुळे घाम येईल, ज्यामुळे तुम्ही सकाळी पूर्णपणे एक्टिव्ह राहाल आणि दिवसभर उत्साही राहाल.5 / 9लिहिण्यासाठी या २० मिनिटांचा वापर करा. तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायच्या कामांची यादी बनवू शकता किंवा तुम्हाला त्रास देणाऱ्या विचारांबद्दल किंवा गोष्टींबद्दल लिहू शकता. 6 / 9२० मिनिटे खोलवर विचार करण्यात आणि लक्ष केंद्रित करण्यात घालवा. लेखन मन शांत करण्यास आणि दिवसाची सुरुवात चांगल्या मानसिकतेने करण्यास मदत करतं.7 / 9तुम्ही २० मिनिटं तुमच्या आवडत्या विषयावरील पुस्तक वाचण्यासाठी किंवा पॉडकास्ट ऐकण्यासाठी वापरू शकता. हे तुमचे मन लवकर एक्टिव्ह होईल आणि दिवसभर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता.8 / 9सकाळी उठल्यावर काही गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. फोन वापरणं टाळा. तसेच उठताच उपाशी पोटी चहा पिणं टाळा, यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. 9 / 9सकाळी पोटाच्या समस्या उद्भवल्याने तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. सकाळी उठल्यानंतर नकारात्मक विचार टाळणं देखील महत्त्वाचं आहे