1 / 8पावसाळा सुरू झाला की सगळीकडे भरपूर पाणी असते. तरीही पिण्याच्या पाण्याचे हाल होतात. कारण पाणी जरी खुप असले तरी ते खराब झालेले असते. त्यात कचरा, माती, धूळ सगळं मिसळत. म्हणून पावसाळ्यात साथीचे आजार वेगाने पसरतात. 2 / 8पावसाचे पाणी साठवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. मात्र ते पाणी तसेच पिणे चांगले नाही. पिण्याचे पाणी जरी फिल्टर होऊन येत असले तरीही त्यात जंतू असतातच. काही गोष्टींची काळजी घेऊन पाण्यामुळे होणारे आजार टाळता येतात. 3 / 8पिण्याचे पाणी भरताना ते किमान १५ मिनिटे उकळायचे. मगच भरायचे. उकळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. त्यातील बॅक्टेरिया तसेच विषाणू नष्ट होतात. उकळल्यावर झाकून ठेवायचे आणि वापरायचे. 4 / 8पाणी भरताना त्यात तुरटीचा खडा गोलगोल फिरवायचा. १० ते २० वेळा फिरवायचा. मग त्या पाण्याला धक्का न लागू देता तसेच तासभर ठेवायचे. पिंपाच्या तळाशी सगळा गाळ जमा झालेला दिसेल. तुरटी पाणी शुद्ध करते. 5 / 8पाणी भरताना पाण्याला आपले हात लागतात. त्यामुळे पाणी भरण्याआधी हात अगदी स्वच्छ धुवायचे. कारण आपल्या हातावर असणारे जंतू पाण्यात जाऊ शकतात. 6 / 8इतर वेळी पाण्याचे पिंप आपण आठवड्यातून एकदा किंवा कधीतरी मध्येच धुतो मात्र पावसाळ्यात पाण्याचे पिंप सतत धुवायचे. म्हणजे तळाला बसलेला गाळ आणि इतर न दिसणारे घटक पिंपात राहत नाहीत.7 / 8जर नळाचे पाणी भरत असाल तर पाणी गाळायचे फडके सतत बदला. चांगले स्वच्छच फडके घ्यायचे. पाणी पिवळट येत असले तर लगेच भरु नका. काही वेळ पाणी वाहू द्या. मगच चांगले स्वच्छ येणारे पाणी घ्यायचे. 8 / 8पाणी गाळण्यासाठी फिल्टर जर लावला असेल, तर त्याची देखभाल करणेही गरजेचे असते. त्याची स्वच्छता करायला हवी. वेळोवेळी तपासणी करुन घ्यायची.