Join us

पावसाळ्यात चहात घालायचे फक्त हे काही पदार्थ, सर्दी खोकला सतत छळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2025 11:33 IST

1 / 8
पाऊस आणि चहा हे जगात भारी कॉम्बिनेशन आहेत. वर्षभरात जेवढा चहा नाही प्यायला जात तेवढा पावसाळ्यात प्यायला जातो. त्यामुळे पावसात चहा हवाच.
2 / 8
चहामध्ये काही पदार्थ घातल्यामुळे चहाची चव वाढते. ते पदार्थ आपल्या माहितीचेही आहेत. मात्र काही पदार्थांमुळे चहा औषधी होऊ शकतो. घशासाठी फायद्याचा ठरु शकतो.
3 / 8
पावसाळ्यात सर्दी खोकला होण्याची शक्यता फार असते. मात्र चहामध्ये रोज असे काही पदार्थ घालायचे आणि मग चहा प्यायचा. या पदार्थांमुळे सर्दी खोकला होण्याची शक्यता कमी होते. पाहा कोणते पदार्थ आहेत.
4 / 8
आल्याचा चहा आपण पितोच. आल्याचा चहा घशासाठी फार चांगला असतो. आल्यामुळे फायदाच मिळतो. मात्र त्यात तुळशीची काही पाने घातल्यामुळे चहा आणखी चांगला होईल.
5 / 8
काळी मिरी अनेक आजारांवर उपयुक्त ठरते. एखाद दुसरी काळी मिरी चहात घालायची. त्यामुळे चहा जरा वेगळाही लागतो आणि सर्दी होत नाही.
6 / 8
पावसाळ्यात सुंठीचा चहा आवर्जून प्यायला हवा. सुंठीमध्ये अनेक गुणधर्म असतात. आरोग्यासाठी फायद्याचे ठरतात आणि सुंठीचा चहा चवीलाही फार छान लागतो.
7 / 8
दालचिनीचा चहा सगळ्यांनाच आवडतो असे नाही. मात्र सर्दी खोकल्यावर हा चहा उपयुक्त ठरतो. करायलाही सोपाच आहे. त्यामुळे नक्की पिऊन पाहा.
8 / 8
टॅग्स : अन्नपाककृतीहेल्थ टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.