1 / 8पावसाळ्याच्या दिवसात वातावरण जरा ओलसर आणि थंड असते. ज्यामुळे सगळ्यांनाच काही त्रास होतात. मात्र लहान मुलांची काळजी जरा जास्त घ्यावी लागते. मुलांची त्यांची समज नसते आणि काहीही खाताना ते जास्त काळजी घेत नाहीत.2 / 8पावसाळ्यात वातावरणामुळे लहान मुलांचे पचन मंद होऊ शकते तसेच थंडाव्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांचा धोका वाढतो. अशा वेळी पोषक आहारच उपयुक्त ठरतो. त्यांना रोज आहारात काय खायला द्यावे पाहा. 3 / 8मुलांना चविष्ट पदार्थ हवे असतात. त्यांना मुळमुळीत अन्न आवडत नाही. पोटाला आधार आणि उष्णता देईल असे पदार्थ द्यावेत. जसे की गव्हाची खीर. चवीला अगदी मस्त असते आणि फार पौष्टिक असते. मुले आवडीने खातात. 4 / 8पावसाळ्यात सूप नक्कीच प्यायला हवे. विविध प्रकारचे सूप मुले आवडीने पितील. त्यांना तिखट लागणार नाही आणि चवही आवडेल असे सूप म्हणजे मक्याचे सूप. स्विटकॉर्न सूप मुलांना नक्कीच द्या. 5 / 8मुलांना रोज रात्री झोपताना हळदीचे दूध प्यायला द्यावे. वर्षानुवर्षे रात्री असे दूध लहान मुलांना दिले जात आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि झोपही छान लागते. थोडी साखर, दूध आणि चमचाभर हळद बास हे मिश्रण फार पौष्टिक आहे. 6 / 8भातावर भाकरीवर तसेच इतरही काही पदार्थांवर थोडेसे तूप ओतल्यावर पचनासाठी मदत होते. तूप पचनासाठी अगदी छान असते. त्यामुळे वरण भातावर थोडे तूप घालून मुलांना द्यावे. 7 / 8विकतचे उघडे अन्न अजिबात खायला देऊ नका. आजकाल साथीचे रोग वाढले आहेत. तसेच मुलांना रोगाची लागण लगेच होते त्यामुळे घरचेच अन्न द्यायला हवे8 / 8पावसाळ्यात दही, ताक असे आंबट पदार्थ जरा टाळावेत. दही फार पौष्टिक आहे. मात्र थंड असल्यामुळे पावसाळ्यात दही खाल्याने सर्दी लगेच होते. त्यामुळे लहान मुलांना शक्यतो दही, ताक देऊ नका.