Join us

सतत थकवा येतो, घशाला कोरड पडते? ‘या’ पद्धतीने पाणी प्या- मिळते एनर्जी आणि त्रासही होत नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2025 17:02 IST

Why Do We Always Feel Tired And Low Energy: काही लोकांना नेहमीच खूप थकवा आलेला असतो, ते अगदी गळून गेलेले असतात. बघा काय असू शकतात यामागची कारणं...(simple tricks to maintain energy level through out day)

ठळक मुद्दे पाण्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस अशी काही खनिजं असतील तरच ते पाणी तुमच्या शरीरात टिकून राहील आणि तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही.

एखाद्या दिवशी जर नेहमीपेक्षा जास्त काम झालं किंवा खूप दगदग झाली तर थकवा येणं, गळून गेल्यासारखं होणं हे समजण्यासारखं आहे. पण काही लोकांना मात्र नेहमीच खूप थकून गेल्यासारखं होतं. कोणतंच काम करण्यासाठी त्यांच्यामध्ये उत्साह नसतो. ते कायम गळून गेलेले असतात (why do we always feel tired and low energy?). ते पाणी तर भरपूर पितात पण तरीही तोंडाला कोरड पडण्यासारखी डिहायड्रेशनची लक्षणं त्यांच्यामध्ये दिसतात (how to avoid dehydration?). असा त्रास का होतो आणि त्यासाठी काय उपाय केले पाहिजेत, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी दिली आहे.(simple tricks to maintain energy level through out day)

 

नेहमीच गळून गेल्यासारखं का वाटतं?

सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ श्वेता शाह सांगतात की डिहायड्रेशन टाळण्यासाठी अनेक जण भरपूर पाणी पितात. पण तरीही डिहायड्रेशन असणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसणारी सगळी लक्षणं त्यांच्यात दिसतात. याचं कारण हेच की नुसतं साधं पाणी पिऊन उपयोग नाही.

वाढत्या वयासोबत रात्रीची झोप कमी झाली? ३ उपाय करून पाहा- अंथरुणावर पडताच शांत झोप लागेल 

कारण त्या पाण्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस अशी काही खनिजं असतील तरच ते पाणी तुमच्या शरीरात टिकून राहील आणि तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही. त्यासाठीच पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाईट घटक यावे यासाठी नेमकं काय करावं याविषयी सांगताना त्या म्हणतात की जे लोक नियमितपणे जीमला जातात किंवा भरपूर व्यायाम करतात त्या लोकांनी एक लीटर पाण्यामध्ये १ चिमूटभर रॉक सॉल्ट घालून प्यावं. हे पाणी व्यायाम करण्याच्याआधी थोडं थोडं करत प्यावं. यामुळे व्यायाम केल्यानंतरही त्यांना अजिबात थकवा जाणवणार नाही. 

 

दुसरा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा ओआरएस प्यावं. नारळपाण्यातही भरपूर प्रमाणात इलेक्ट्रोलाईट असतात. त्यामुळे ते ही आठवड्यातून एक- दोनदा प्यावं.

तिसरा उपाय म्हणजे १ लीटर पाण्यात पुढील पदार्थ घालून ते पाणी प्यावं. यासाठी ५ वेगवेगळे पर्याय दिले आहेत. त्यापैकी जो तुम्हाला सोपा वाटेल तो निवडावा.

पौष्टिक असतं म्हणून जवस जास्त खाल्लं तर तब्येत बिघडेल! जवस खाण्याचं योग्य प्रमाण किती?

१. सफरचंदाच्या ३ फोडी, अर्धा इंच दालचिनी आणि १ टीस्पून लिंबाचा रस

२. २ वेलची आणि २ तुळशीची पानं

३. पुदिन्याची त्याच्या देठासह असणारी दोन पानं आणि कडिपत्त्याची ५ पानं

४. १ अंजीर, अर्धा इंच दालचिनी, दोन लवंग आणि १ वेलची

५. १ तेजपान आणि १ चक्रफूल  

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सपाणी