Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...

टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...

बरेच लोक चहा बराच वेळ उकळतात जेणेकरून त्याची चव चांगली होते. पण जर चहा गरजेपेक्षा जास्त उकळला तर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 17:44 IST2025-07-14T17:37:38+5:302025-07-14T17:44:20+5:30

बरेच लोक चहा बराच वेळ उकळतात जेणेकरून त्याची चव चांगली होते. पण जर चहा गरजेपेक्षा जास्त उकळला तर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

tea lovers listen up boiling tea repeatedly is dangerous for healt know why | टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...

टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...

सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळचा थकवा असो... एक कप चहा पुरेसा असतो. बरेच लोक चहा बराच वेळ उकळतात जेणेकरून त्याची चव चांगली होते. पण जर चहा गरजेपेक्षा जास्त उकळला तर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. जास्त वेळ उकळल्याने चहातील पोषक घटक नष्ट होऊ शकतात आणि एसिडिटी, पोटदुखी, निद्रानाश यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत चहा योग्य पद्धतीने उकळणं महत्त्वाचं आहे आणि काही चुका टाळल्या पाहिजेत.

तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये असलेले कॅफिन, टॅनिन आणि अँटीऑक्सिडंट्स हे घटक मर्यादित काळ उकळल्यास प्रभावी ठरतात. जर चहा बराच काळ किंवा खूप कमी काळ उकळला तर त्याचा चव, गुणवत्ता आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही चहा लवकर बनवला आणि प्यायलात, म्हणजेच फक्त १-२ मिनिटे उकळला, तर चहाच्या पानांमध्ये असलेले पोषक घटक पूर्णपणे विरघळत नाहीत. अशा परिस्थितीत चहाची चव येत नाही आणि आरोग्यालाही फायदा होत नाही.

'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा

जास्त वेळ उकळू नका चहा

जर चहा जास्त वेळ, म्हणजेच १० मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ उकळला गेला तर त्यात टॅनिनचं प्रमाण खूप वाढतं, ज्यामुळे चहा कडू वाटू लागतो. असा चहा प्यायल्याने पोटात गॅस, एसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जास्त उकळलेल्या चहामध्ये कॅफिनचं प्रमाण देखील जास्त असतं, ज्यामुळे डोकेदुखी, चिंता आणि निद्रानाश यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणूनच लोकांनी जास्त वेळ चहा उकळू नये.

आरोग्य सांभाळा! चहा आणि कॉफी किती वेळानंतर होते खराब? निष्काळजीपणा ठरेल घातक

किती वेळ उकळावा चहा?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहा फक्त ४-५ मिनिटं उकळणं योग्य आहे, यामुळे चहा छान होतो आणि आरोग्य निरोगी राहतं. दुधाची चहा असो किंवा काळी चहा, दोन्ही जास्त वेळ उकळू नयेत. चहा बनवताना, प्रथम पाणी उकळवं आणि नंतर त्यात चहा पावडर घाला. मंद आचेवर २-३ मिनिटं उकळवा, नंतर चवीनुसार साखर आणि दूध घाला. ते आणखी १-२ मिनिटे उकळवा आणि लगेच गाळून घ्या. चहा बराच वेळ उकळल्याने त्याची चव खराब होते.


 

Web Title: tea lovers listen up boiling tea repeatedly is dangerous for healt know why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.