'पाणीपुरी' फक्त नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. मस्त आंबट - गोड चवीची चटपटीत पाणीपुरी खाण्याचा मोह आजपर्यंत कुणालाही आवरता आलेला नाही. आपल्यापैकी काहीजणांना पाणीपुरी इतकी आवडते की ते कधीही आणि कितीही प्लेट पाणीपुरी खाऊ शकतात. असे पाहता आपण वर्षाचे बाराही महिने पाणीपुरी खातोच. मुसळदार कोसळणाऱ्या पावसात गरमागरम रगडा आणि मसालेदार पाण्यासोबत कुरकुरीत पाणीपुरी खाण्याचा आनंद काही औरच असतो. मात्र, या ऋतूत स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने पाणीपुरी खावी की नाही, हा प्रश्न अनेकांना पडतो(Should You Eat Golgappa During Rainy Season Is It Safe To Enjoy Street Food In Monsoon Dietitian Explains).
आरोग्यदृष्ट्या विचार केला तर पावसाळ्यात पाणीपुरी खाण्याबद्दल थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात हवा दमट असते, सांडपाणी साचते, आणि संसर्गजन्य जंतू वाढतात. अशा परिस्थितीत रस्त्यावर किंवा उघड्यावर मिळणाऱ्या पाणीपुरीच्या पाण्यात किंवा साहित्यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया आणि विषाणू असण्याची शक्यता अधिक जास्त असते. त्यामुळे अशा अन्नपदार्थांतून (Stay away from these unhygienic street foods in monsoon) पोटाच्या आजारांचा, जुलाब, उलट्या, फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो. यासाठीच, पावसाळ्यात नेमके पाणीपुरी खावी की खाऊ नये? याबद्दल नवी दिल्लीतील पूनम डाएट अँड वेलनेस क्लिनिकच्या आहारतज्ज्ञ पूनम दुनेजा यांनी न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत त्या काय सांगतात ते पाहूयात....
पावसाळ्यात पाणीपुरी खावी की खाऊ नये ?
आहारतज्ज्ञ पूनम दुनेजा यांच्या मते, पावसाळ्यात आपली पचनसंस्था अधिक जास्त मंदावते. या काळात पचनास जड, तळलेले आणि मसालेदार अन्नपदार्थ खाणं शक्यतो टाळावं. पाणीपुरीसारख्या रस्त्यावरील वेगवेगळ्या स्नॅक्स फुड्समध्ये भरपूर प्रमाणात तेल आणि मसाले असतात. याशिवाय, पाणीपुरीच्या पाण्यात कुठलाही दूषित पदार्थ असेल, तर तो पोटात जाऊन संसर्ग होऊ शकतो. मात्र, पाणीपुरी स्वच्छतेची काळजी घेऊन तयार केलेली असेल, तर कोणतीही समस्या येत नाही. पण जिथे स्वच्छतेचा अभाव असेल, तिथे शक्यतो पाणीपुरी खाऊ नये.
कढी फुटते-पांचट लागते-बेसनाच्याही गुठळ्या होतात? टाळा ४ चुका, कढी होईल फक्कड...
आहारतज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात रस्त्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळणे उत्तम आहे, कारण पावसातील ओलाव्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने पसरतात. जर पाणीपुरी घरी तयार केलेली असे तर हा बाहेरील पदार्थांपेक्षा सुरक्षित असा पर्याय आहे. बाहेरील पाणीपुरी खाणे टाळावे, कारण पावसात जंतू लवकर वाढतात, ज्यामुळे अतिसार, संसर्ग, गॅस अशा पोटाच्या समस्या होऊ शकतात.
मलायका अरोरासारखी फिगर हवी? करा तिचा 'हा' एक सिक्रेट व्यायाम - मिळेल तिच्यासारखी फिगर...
आहारतज्ज्ञ असे सांगतात की, पावसाळ्यात पाणीपुरी खाताना त्यातील पाण्याचे प्रमाण कमी ठेवावे आणि खूप मसालेदार किंवा आंबट मसाले वापरणे टाळावे. चटपटीत, मसालेदार, तिखट अशी पाणीपुरी खाल्ल्याने पचनसंस्थेत बिघाड होऊ शकतो. याचबरोबर, पोटात जळजळ किंवा आम्लता वाढू शकते. पावसात पाणीपुरी खाण्याचा आनंद घ्यावा, पण आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या 'या' झाडाची पानं आहेत गुणकारी, टाचदुखी होईल कमी पाहा पारंपरिक उपाय...
जर तुम्हाला आधीपासून पोटाच्या समस्या असतील किंवा तुमची पचनसंस्था कमकुवत असेल, तर पावसाळ्यात पाणीपुरी खाणे टाळणेच उत्तम. त्याऐवजी, शेंगदाणे, भाजलेले मखाणे किंवा मोड आलेली कडधान्ये यांसारखे घरीच तयार केलेले आरोग्यदायी स्नॅक्स खाऊ शकता.