शरीरातील तीन दोषांपैकी एक म्हणजे पित्त दोष. आपल्यापैकी बऱ्याचजणांना पित्त दोषाची समस्या फार त्रास देते. आयुर्वेदानुसार, पित्त दोषाचा मुख्य संबंध पचनक्रिया, शरीराचे तापमान आणि चयापचय क्रियेच्या नियंत्रणाशी असतो. जेव्हा हा दोष असंतुलित होतो, तेव्हा अपचन, अॅसिडिटी, जळजळ,त्वचेचे विकार, डोकेदुखी यांसारख्या (Pitta Dosha and Home Remedies To Balance it) समस्या उद्भवतात. चुकीच्या खाण्यापिण्याच्या (Natural Pitta Dosha Treatment) सवयी, अपुरी झोप, तणाव आणि अनियमित जीवनशैली ही यामागची प्रमुख कारणे असू शकतात. पित्त झाले की अस्वस्थ व्हायला होते(Home Remedies for Pitta Natural Relief Tips).
पित्ताचा त्रास उन्हाळ्यात जास्त प्रमाणात होतो मात्र पित्तप्रवृत्ती असलेल्या लोकांना बाराही महिने पित्तामुळे जळजळत राहते तसेच मळमळते. इतरही अनेक त्रास होतात. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची गोळ्या, औषध घेतो. परंतु पित्तासाठी असे उपाय केल्याने त्याचा परिणाम हा तात्पुरता दिसतो. अशा परिस्थितीत, पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी गोळ्या, औषध घेण्यासोबतच आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीत थोडे बदल केल्यास त्याचा आपल्याला फायदाच होतो. आयुर्वेदिक, डॉक्टर ऋचा मेहेंदळे- पै यांनी त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओवरून पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी रोजच्या आहारात एक छोटासा बदल करण्याचा सल्ला दिला आहे, तो नेमका काय आहे ते पाहूयात.
पित्ताचा त्रास सतावतो मग आहारात करुन पाहा हे खास बदल...
आयुर्वेदिक, डॉक्टर ऋचा मेहेंदळे- पै यांनी, पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी साजूक तुपापेक्षा दुसरं कोणतेही उत्तम औषध नाही असे सांगितले आहे. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी रोजच्या आहारात साजूक तूप घेणे अधिक फायदेशीर ठरते. यासाठी पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी रोजच्या आहारात साजूक तूप खाल्ले पाहिजे असा सल्ला त्या देतात.
आयुर्वेदिक, डॉक्टर ऋचा मेहेंदळे- पै यांनी सांगितल्याप्रमाणे, पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर ग्लासभर कोमट पाण्यात चमचाभर साजूक तूप मिसळून पिण्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते. या उपायामुळे आपला जठराग्नी प्रदीप्त होण्यास मदत होते. आपण एखाद्या हवंन कुंडामधील अग्नी प्रज्वलित होण्यासाठी जसे त्यात साजूक तूप घालतो, त्याचप्रमाणे आपल्या पोटातील जठराग्नी प्रदीप्त होण्यासाठी देखील साजूक तूप खाणे फायदेशीर ठरते.
व्यायामाला वेळ नाही? महिलांनो, 'या' ३ पद्धतीने रोज चाला-लोक विचारतील वजन कमी करण्याचं सिक्रेट...
आपण दिवसभरात जे काही खातो ते योग्यरित्या पचवण्यासाठी जठराग्नी प्रदीप्त होणे गरजेचे असते. जेव्हा हा जठराग्नी प्रदीप्त होतो तेव्हा आपण खाल्लेले अन्नपदार्थ हे दिवसभरात योग्य पद्धतीने अगदी सुरळीपणे पचवले जाते. जर हा जठराग्नी प्रदीप्त झाला नाही आणि आपण अन्नपदार्थ फक्त खात राहिलो तर त्याचे योग्यरीत्या पचन होणार नाही यामुळे अपचन, ॲसिडिटी, पित्त यांसारख्या समस्या वाढतात.
स्वयंपाकघरात तासंतास उभं राहून पाय दुखतात? ३ सोप्या गोष्टी, पाय-टाचा-कंबर दुखणार नाही...
पित्ताच्या त्रास कमी करण्यासाठी गरम पाण्याबरोबर साजूक तूप घ्यावे. इतकेच नाही तर रोजच्या आहारातील चपाती किंवा भाकरीला देखील साजूक तूप लावून खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. चपाती आणि भाकरी यांसारखे पदार्थ हे रुक्ष आहार आहेत. या रुक्ष पदार्थांना स्निग्धता येण्यासाठी चपाती किंवा भाकरीला साजूक तूप लावून खाणे अधिक फायदेशीर ठरते. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी रोजच्या आहारात साजूक तूप खाणे अधिक फायदेशीर ठरते.