पावसाळा हा ऋतू जरी फार छान आणि प्रसन्न असला तरी काही त्रास सहन करावेच लागतात. प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही बदल घडतात आणि त्याचा परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही स्वरुपात असतो. पावसाळ्यात वातावरण छान प्रसन्न असते. हवामान जरा गार असते. उन फार कमी पडते. सूर्य आकाशात लपला असतो. त्यामुळे कपडेही वाळत नाहीत. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात कपडे अगदी कडक वाळतात. उन्हाळ्यात तर इस्त्री केल्यासारखे वाळतात. मात्र पावसाळ्यात कपडे जरा दमट राहतात. नशीबाने कधी उन पडले तरच कपडे जरा कडक वाळतात. असे दमट कपडे वापरावे लागतात. त्याचा शरीराला खास म्हणजे त्वचेला जरा त्रास होतो.
दमट कपड्यांमुळे गुप्तांगांना खाज सुटते. ओलसर कपड्यांमुळे मांड्याही काचतात. दमटपणामुळे खाज सुटते. खाजवल्यामुळे रॅश उठतात. काही जण तर जरा ओले कपडेही वापरतात. असे कपडे अजिबात वापरु नका. त्वचेसाठी ते त्रासदायक ठरते. दमट कपड्यांमुळे त्रास होऊ नये यासाठी हे उपाय करा.
कपडे थोडा वेळ पंख्याखाली वाळवा मगच घाला. सैल मोकळे कपडे घाला. जेणेकरुन गुप्तांगांना वारा लागेल. वारा लागल्यावर खाज सुटणार नाही. त्वचा लाल होणार नाही. मांड्यांनाही आराम मिळेल. तसेच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अंघोळी नंतर शरीर अगदी कोरड करायचं आणि जिथे खाज येते त्या ठिकाणी तेल चोळायचे. बदामाचो तेल फार उपयुक्त ठरते. साधे खोबरेल तेलही चालते. तेल छान चोळून लावायचे. थोडावेळ तसेच ठेवायचे. वाऱ्याखाली बसायचे. मग कपडे घालायचे. तेलामुळे खाज कमी होते आणि रॅश उठत नाही.
महिलांनी खास गुप्तांगांसाठी वेगळे वॉश मिळते. ते वापरावे. साबणामुळे कधीकधी त्वचा खाजते. साबणामुळे त्रास होतो. मात्र खास गुप्तांगासाठी तयार केलेल्या वॉशचा वापर केल्यावर ती जागा जास्त छान साफ होते. दमट कपड्यांचाही परिणाम कमी होतो. अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाचा पाला टाकायचा. शरीरावरील जंतू बॅक्टेरिया त्रास देत नाही. खाज अगदी जोरात सुटत असेल तर पाण्याने जागा साफ करायची. सतत खाजवू नका. खाजवल्यामुळे जखम होण्याची शक्यता असते. दोन दिवसात हा त्रास थांबला नाही तर डॉक्टरांकडे जा. वेगळी कारणेही असू शकतात.