काही शारीरिक त्रास आपल्या घरातील वृद्ध, वयस्कर व्यक्तींना असतात. त्यांची आपण काळजी घेतो. मग मधुमेह असेल किंवा रक्तदाब असे त्रास घरोघरी दिसून येतात. (Continuously increasing blood pressure can be life-threatening, reduce the problem of hypertension and avoid the risk)एका वयानंतर गोळी घ्यायला लागायचीच असे डॉक्टर म्हणतात, मात्र तरुण वयातच असे त्रास सुरु होण्याचे प्रमाण वाढत चाल्ले आहे. आजकाल अगदी २५ वर्षाच्या मुलांनासुद्धा असे त्रास उद्भवतात. त्याचे कारण म्हणजे बदलणारी जीवनशैली आणि प्रदुषित वातावरण. रक्तदाबाचा त्रास आजकाल अनेकांना छळतो. उच्च रक्तदाब ज्याला आपण हायपरटेन्शन असे ही म्हणतो. ही समस्या बरी करता येतेच मात्र जास्त वाढल्यास फार गंभीर ठरु शकते. फार कळून येतील अशी लक्षणेही नसतात. मात्र हायपरटेन्शन हृदयविकार होतात. तसेच स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. काही केसेसमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढवतो. ही स्थिती टाळण्यासाठी वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.
तरुण पिढीमध्ये वाढलेले व्यसनांचे प्रमाण फार धोकादायक आहे. तंबाखू , धूम्रपान, मध्यपान या सगळ्याचा शरीरावर फार वाईट परिणाम होतो. त्यामुळे व्यसनांच्या आहारी जाऊ नका. रक्तदाबाचा त्रास सुरु होण्याला हे ही एक कारण आहेच.
आरोग्यासाठी योग्य ठरेल एवढेच वजन व्यक्तीचे असायला हवे. अतिरिक्त वजनामुळे हृदयावर ताण येतो. त्यामुळे रक्तदाब वाढतो. अति वजनामुळे जर रक्तदाबाचा त्रास सुरु झाला असेल तर तो नक्कीच आटोक्यात आणता येईल. फक्त वजन कमी करा. सगळे त्रास थांबतील.
आहारात जर काही कमी पडत असेल तरी रक्तदाबावर परिणाम होतो. त्यामुळे सगळी सत्व असलेले पदार्थ आहारात असायलाच हवेत. फळे, पालेभाज्या, धान्ये, सुकामेवा, बिया असे पदार्थ आहारात असावेत. घरचा पौष्टिक आहार घ्यावा. विकतचे अरबटचरबट खाऊ नका.
रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी गोळी वेळेवर घेणे फार गरजेचे असते. तसेच नियमित तपासणी करुन घ्यायची. ज्यांना असा काही त्रास नाही त्यांनीही वेळोवेळी तपासणी करायला हवी. पायाला सारखी सूज येणे, श्वासाला त्रास होणे, अतिरिक्त वजन असेल तर वेळीच सवयी बदला आणि आरोग्याची काळजी घ्या. कारण पुढे जाऊन हायपरटेन्शनचा त्रास उद्भवू शकतो. शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही फार महत्त्वाचे असते.