Monsoon Healthy Tips: पावसाच्या रिमझिम धारा जरी शरीराला आणि मनाला आनंद देणाऱ्या असल्या तरी पावसाळ्यात वेगवेगळे आजार डोकं वर काढतात. पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं नुकसान तर होतंच, सोबतच खासकरून पोटासंबंधी समस्या सगळ्यात जास्त होतात. दूषित पाण्यामुळे पोटासंबंधी (Stomach Problem In Monsooon) या समस्या होतात. तसेच हिरव्या पालेभाज्या अधिक खाल्ल्या जातात. पण यातील सूक्ष्म कीटक पोटात जातात. वातावरणही कधी थंड कधी उष्ण असतं. ज्यामुळे शरीर प्रभावित होतं आणि आरोग्य बिघडतं. याबाबत आयुर्वेद एक्सपर्ट मनीषा मिश्रा सांगतात की, पावसाच्या दिवसांमध्ये पोट बिघडणं म्हणजे वात असंतुलित होणं. अशात जर नेहमीच पोट बिघडत असेल तर काही घरगुती उपाय करू शकता.
पोटाचं आरोग्य चांगलं कसं ठेवाल?
- आयुर्वेद एक्सपर्ट सांगतात की, पावसाळ्यात नेहमीच पोट बिघडू नये यासाठी तप्तशीतजल मदत करू शकतं. तप्तशीतजल याचा अर्थ आधी पाणी उकडून घ्यावं आणि नंतर ते थंड करून प्यावं. असं पाणी प्यायल्यास पचन तंत्र चांगलं राहतं.
- लांब काळी मिरी आणि साधी काळी मिरी सुद्धा पोटासाठी फायदेशीर ठरते. तसेच वाळलेल्या आल्याचाही आहारात समावेश करावा. पचन तंत्र चांगलं ठेवण्यासाठी मध खाऊ शकता.
- आयुर्वेद एक्सपर्ट सांगतात की, पावसाळ्यात सत्तू आणि पालक खाणं टाळलं पाहिजे. कारण या दोन्ही गोष्टींमुळे पोटात गॅस तयार होतो.
- या दिवसांमध्ये घरात कडूलिंब, गुग्गूळ किंवा मोहरीचा धूर करणं देखील फायदेशीर मानलं जातं. असं केल्यास घरातील कीटाणू बाहेर जातात.
- आयुर्वेद एक्सपर्ट सांगतात की, पावसाळ्यात पोटासंबंधी समस्या होऊ नये यासाठी विना चप्पल चालणे आणि दिवसा झोपणं टाळलं पाहिजे.