Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आयुर्वेदानुसार लगेच 'या' गोष्टी करणं टाळा, पोटाच्या वेगवेगळ्या समस्या लगेच होतील दूर...

आयुर्वेदानुसार लगेच 'या' गोष्टी करणं टाळा, पोटाच्या वेगवेगळ्या समस्या लगेच होतील दूर...

Health Tips : आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांनी जेवणानंतर काय चुका टाळाल आणि पचन तंत्र मजबूत कसं ठेवाल याबाबत काही टिप्स देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 11:15 IST2025-06-09T11:14:36+5:302025-06-09T11:15:27+5:30

Health Tips : आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांनी जेवणानंतर काय चुका टाळाल आणि पचन तंत्र मजबूत कसं ठेवाल याबाबत काही टिप्स देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Ayurveda doctor shares 10 things which you should avoid post meal for better digestion | आयुर्वेदानुसार लगेच 'या' गोष्टी करणं टाळा, पोटाच्या वेगवेगळ्या समस्या लगेच होतील दूर...

आयुर्वेदानुसार लगेच 'या' गोष्टी करणं टाळा, पोटाच्या वेगवेगळ्या समस्या लगेच होतील दूर...

Health Tips : पचन तंत्र चांगलं असणं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. म्हणजे जर पचनक्रिया व्यवस्थि होत नसेल तर रोज आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. पचन तंत्र जर मजबूत असेल तर शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात, शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया सुरळीत होता, एनर्जी मिळते आणि इम्यून सिस्टीमही मजबूत राहतं. याशिवाय मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहतं.

मात्र, कळत-नकळत बरेच लोक अशा काही चुका करतात, ज्यामुळे पचन तंत्र बिघडतं. त्यानंतर मग जुलाब, गॅस, ब्लोटिंग, अॅसिडिटी अशा समस्या होतात.
आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांनी जेवणानंतर काय चुका टाळाल आणि पचन तंत्र मजबूत कसं ठेवाल याबाबत काही टिप्स देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांच्या या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळेल.

लगेच झोपू नका

बऱ्याच लोकांना जेवण केल्यावर लगेच झोपण्याची सवय असते. डॉक्टर सांगतात असं अजिबात करू नये. कारण असं केल्यास शरीराचं मेटाबॉलिज्म स्लो होतं, ज्याचा अर्थ पचनक्रिया स्लो होते. पचन चांगलं होत नाही आणि मग पोट बिघडतं.

भरपूर पाणी

डॉक्टरांनी सांगितलं की, जेवण झाल्या झाल्या लगेच भरपूर पाणी पिणं टाळलं पाहिजे. जेवणाच्या आधी किंवा लगेच नंतर पाणी पिऊ नये. यानं पचनक्रिया व्यवस्थित होत नाही.

स्वीमिंग, जास्त पायी चालणं

जेवण केल्यावर लगेच स्वीमिंग, एक्सरसाईज किंवा जास्त लांब चालू नये. जेवणानंतर लगेच या गोष्टी केल्या तर वात वाढू शकतो आणि पचनक्रियेतही अडथळा निर्माण होतो. 

लगेच अभ्यास टाळा

जेवण केल्यावर लगेच अभ्यास करणं सुद्धा टाळलं पाहिजे. जेवल्यावर लगेच अभ्यास कराल तर अभ्यासात लक्ष लागणार नाही आणि पचनक्रियाही व्यवस्थित होणार नाही.

आंघोळ टाळा

जेवण केल्यावर लगेच आंघोळ करणं टाळलं पाहिजे. साधारण २ तासांनंतर तुम्ही आंघोळ करू शकता. जेवण झाल्यावर लगेच आंघोळ केल्यानं शरीराचं तापमान कमी होतं आणि त्यामुळे पचनक्रिया चांगली होत नाही.

पचनक्रिया कशी सुधाराल?

जेवण केल्यानंतर वज्रासन केल्यानं पोटाच्या खालच्या भागात रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. तसेच सूज, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी इतर समस्याही दूर होतात. तसेच जेवण झाल्यावर १० ते १५ मिनिटं पायी चाला.

Web Title: Ayurveda doctor shares 10 things which you should avoid post meal for better digestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.