त्वचेचे अनेक त्रास सतत होत असतात. उन्हाळ्यात उन्हामुळे त्वचा जळते. त्यामुळे करपल्यासारखी दिसायला लागते. सूर्यप्रकाशामुळे झोंबते आणि खाजही येते. पावसाळ्यात त्वचा चिकट होते. (Always add these leaves to your bath water, body odor and skin infections will not bother you during the monsoon)हिवाळ्यात कोरडी पडते. सगळ्या ऋतूंमध्ये त्वचेला त्रास सोसावेच लागतात. पिंपल्स, फोडं, ओपन पोर्स, तेलकटपणा हे प्रकार तर आहेतच. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी काही सोपे उपाय असतात. घरगुती उपाय आपण करतोच.
अंघोळ सगळे रोज करतात. अंग स्वच्छ ठेवण्यासाठी अंघोळ करणे गरजेचे असते. अंघोळ करताना आपण साबण, शाम्पू इतर गोष्टी वापरतो. त्यासोबत आणखी काही गोष्टी वापरल्या तर त्वचेचे त्रास नक्कीच कमी होतील. खाज येणे तसेच रॅश उठणे उष्णतेचे फोड आणि चेहर्यावरील डाग कमी होतील. त्यासाठी पाण्यात या काही पदार्थांचा वापर करायचा.
१. अंघोळीसाठी छान गरम किंवा कोमट पाणी घ्यायचे. पाण्यात कडुलिंबाचा पाला घालायचा. आणि मग त्या पाण्याने अंघोळ करायची. ही पाने अँण्टीबॅक्टेरियल असतात. तसेच त्यात अँण्टीऑक्सिडंट्स असतात. एवढेच नाही तर अँण्टीफंगलही असतात. या सगळ्या गुणधर्मांचा त्वचेला फायदा होतो. साबणातही कडुलिंब वापरले जाते. मात्र नैसर्गिक पाला जास्त फायद्याचा ठरेल. अंघोळ करताना अंगाला बेसन लावायचे. बेसनामुळे त्वचा उजळते आणि डाग कमी होतात. वर्षानुवर्षे महिला अंघोळीसाठी बेसनाचे पीठ वापरत आल्या आहेत.
२. अंघोळीच्या पाण्यात छान तुळशीची पाने घालायची. तुळशीची पाने त्वचेसाठी चांगली असतात. खास म्हणजे चेहर्यासाठी. तुळशीच्या पानांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते, ज्यामुळे मुरुम, पिंपल्स होत नाहीत. गरम पाण्यात उकळून
घेतली तरी चालेल. अशीच पाण्यात घातली तरी चालते.
३. बेलाची पाने फार औषधी असतात. त्वचा विकारांवर अगदी रामबाण उपाय आहे. त्वचा स्वच्छ आणि उजळ ठेवण्यासाठी ही पाने उपयुक्त ठरतात. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात बेलाची पाने घालायची.
पाला किंवा पाने वापरताना मात्र स्वच्छ धुवायची मग पाण्यात घालायची. तसेच रोज अशी अंघोळ करायची गरज नाही. आठवड्यातून दोनदा केली तरी पुरे आहे. ताजी पाने वापरणे जास्त प्रभावी ठरेल. त्यामुळे जून पानांपेक्षा ताजीच घ्या.