Food Tips : तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर अनेकदा पालक-पनीर ही भाजी खाल्ली असेलच. अनेकदा घरीही बनवली असेल. ही एक अनेकांना आवडणारी आणि टेस्टी भाजी आहे. पनीर आरोग्यासाठीही फायदेशीर असतं आणि पालकाचेही अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, पनीर आणि पालक कधीच एकत्र खाऊ नये. एक्सपर्ट सांगतात की, पालक आणि पनीर कधीच सोबत खाऊ नये.
न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल यांनी याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केला आहे. ज्यात त्यानी सांगितलं की, पनीरमध्ये कॅल्शिअम असतं आणि पालकमध्ये आयर्न असतं. हे दोन्ही तत्व एकत्र पोटात जाता कामा नये. यामुळे आरोग्याचं नुकसानच होतं.
पालक पनीरसोबत खाल्ल्यानं पचन तंत्राचं नुकसान होतं. कारण कॅल्शिअम आणि आयर्न या दोन्ही गोष्टी एकत्र पचवणं अवघड असतं. अशात तुम्हाला अॅसिडिटी, जुलाब, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या होऊ शकतात. पुढे जाऊन या समस्या अधिक वाढू शकतात.
पालक आणि पनीरमध्ये कॅल्शिअम आणि आयर्न भरपूर असतं. जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी एकत्र खाता तेव्हा शरीर आयर्न अवशोषण करू शकत नाही. हे शरीरासाठी चांगलं नाही. अशात शरीरात आयर्नची कमतरता होऊ शकते आणि तुमच्या शरीरातील हीमोग्लोबिन प्रभावित होतं.
तर पालकामध्ये ऑक्सालिक अॅसिड असतं आणि पनीरमध्ये कॅल्शिअम. अशात ऑक्सालिक अॅसिड कॅल्शिअमसोबत मिळून किडनीमध्ये स्टोन होऊ शकतो. अशात तुम्हाला असह्य वेदनांचा सामना करावा लागू शकतो.