Join us

हिवाळ्यात नारळ पाणी पिणं चांगलं की वाईट? 'या' आरोग्यविषयक समस्यांवर आहे रामबाण उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:24 IST

हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याबाबत अनेक गैरसमज पसरवले जातात.

नारळ पाण्यातील हायड्रेटिंग आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचा आणि केसांना मॉइश्चराइज आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. याशिवाय, हे पोटासाठी खूप चांगलं आहे आणि प्रतिकारशक्ती वाढवतं. पण हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याबाबत अनेक गैरसमज पसरवले जातात, पण प्रत्यक्षात त्याचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. नारळ पाणी हे आरोग्यदायी पेय आहे, त्याचे फायदे जाणून घेऊया...

शरीर हायड्रेटेड राहतं

हिवाळ्यात लोक अनेकदा कमी पाणी पितात, त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. अशा परिस्थितीत नारळ पाणी शरीरातील पाण्याचं योग्य प्रमाण राखण्यास मदत करतं, जे निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचं आहे.

प्रतिकारशक्ती मजबूत राहते

नारळ पाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांसारखे मिनरल्स असतात, जे शरीराला केवळ पोषण देत नाहीत तर रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत करतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांनी नारळ पाणी नक्कीच प्यावं.

सर्दी आणि खोकल्यापासून संरक्षण 

नारळ पाणी थंड हवामानात इन्फेक्शन आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करतं. हे तुमची पचनशक्ती मजबूत ठेवण्याचं काम करतं. हिवाळ्याच्या काळात बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या समस्या अनेकदा वाढू शकतात, अशा परिस्थितीत नारळ पाणी आराम देण्यास मदत करू शकतं. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यथंडीत त्वचेची काळजी