आपल्यापैकी बऱ्याचजाणांना रोजच्या जेवणात दही आवर्जून खाण्याची सवय असते. आपल्याकडे जेवणाच्या थाळीत दह्याला फार महत्वाचे स्थान असते. दही (How To Consume Curd As Per Ayurveda) फक्त पदार्थांची चवच वाढवत नाही तर तर आयुर्वेदात दह्याला आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर मानले आहे. आयुर्वेदानुसार, दही (Ayurvedic Doctor Shares Rules For Eating Curd) हे एक प्रकारचं औषध आहे जे (How To Eat Curd According To Ayurveda) पचनसंस्थेचे संतुलन राखते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीराला थंडावा देते. दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, आयुर्वेदानुसार दही खाण्याची खास पद्धती आहेत ज्यामुळे त्याचे फायदे अधिकाधिक मिळू शकतात(How To Consume Curd The Ayurvedic Way).
दही हा आयुर्वेदातील अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यवर्धक पदार्थ समजला जातो, असे असले तरी त्याचा आरोग्यासाठी पूर्ण फायदा घेण्यासाठी दही योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे खाणं आवश्यक असते. दही कधी, कसे आणि किती प्रमाणात खाल्ले पाहिजे याचा विचार न केल्यास त्याचा उलट परिणामही होऊ शकतो. त्यामुळे दही खाण्याच्या योग्य मार्गानेच त्याचा खरा फायदा आपल्या आरोग्यास मिळतो. dr.manisha.mishra यांनी त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओवरून आयुर्वेदानुसार ( The Ayurvedic Way Of Consuming Curd For Maximum Benefits) दही खाण्याचे मुख्य ४ नियम कोणते याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
आयुर्वेदानुसार दही खाताना लक्षात ठेवा ४ नियम...
१. दररोज दही खाऊ नका :- डॉ. मनीषा मिश्रा सांगतात की आयुर्वेदानुसार दही रोज खाणं टाळावं. कारण दही हे उष्ण स्वरुपाचं मानलं जातं आणि ते पचायला थोडेसं जड असतं, त्यामुळे ते शरीरातील कफ वाढवण्याचं काम करतं. दररोज दही खाल्ल्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो, आणि त्यामुळे अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, लठ्ठपणा तसेच त्वचेच्या समस्या होण्याची शक्यता वाढते.
२. रात्रीच्या वेळी दही खाणं टाळा :- डॉक्टर सांगतात की रात्री शरीराची पचनशक्ती नैसर्गिकरित्या कमी होते. त्याचवेळी, दही हा जड आणि कफवर्धक पदार्थ असल्यामुळे रात्री ते खाल्ल्यास शरीरात कफ वाढू शकतो. यामुळे सर्दी, खोकला, श्वास घेण्याच्या तक्रारी किंवा इतर कफसंबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते, यासाठीच आयुर्वेदानुसार रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे, दही दिवसभरात किंवा दुपारच्या वेळेतच खाणं योग्य मानलं जातं.
धो - धो कोसळणाऱ्या पावसात घ्या तंदुरी कॉर्न खाण्याचा आनंद! पावसाळ्यातील चटपटीत - मसालेदार पदार्थ...
३. दही कधीही गरम करून खाऊ नये :- दही गरम केल्याने किंवा शिजवल्याने त्यामधील प्रोबायोटिक म्हणजेच चांगले बॅक्टेरिया मरतात, जे पचनासाठी खूप उपयुक्त असतात. त्यामुळे दह्यातील पौष्टिक घटक आणि संतुलन दोन्ही बिघडतं. तसेच गरम केल्याने दह्यातील प्रथिने देखील खराब होतात, ज्यामुळे शरीराला त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. यासाठीच दही कधीही गरम करून, भाज्यांमध्ये शिजवून किंवा उष्ण तापमानात असताना खाऊ नये. दही नेहमी ताजं आणि थंड असतानाच खावं, असं आयुर्वेद सांगते.
४. दही नेहमी ऋतूबदलांनुसारच खावं :- डॉक्टरच्या सांगण्यानुसार, दही हे उष्ण गुणधर्माचे असल्याने ते हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात खाणं फायदेशीर ठरू शकतं. कारण या ऋतूंमध्ये शरीराला थोडी उष्णता आवश्यक असते. यासाठीच, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात योग्य प्रमाणात दही घेतल्यास ते पचनाला मदत करू शकतं. परंतु, उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये दही खाणं टाळावं, कारण या ऋतूंमध्ये दह्यामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता आणि कफ वाढू शकतो, ज्यामुळे अॅसिडिटी, त्वचेच्या समस्या किंवा सर्दी-खोकल्यासारख्या त्रासांची शक्यता वाढते. यासाठीच, आयुर्वेदानुसार ऋतू बदलांनुसार दही खाणे हे शरीराच्या संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
संशोधनाचा दावा, कंबरेचा घेर सांगतो हार्ट ॲटॅक येण्याचा धोका, मोजा तुमची कंबर आहे किती...
५. मग दही नेमकं कस खावं ?
दही रात्री खाण्याऐवजी फक्त दिवसाचं खावं. उन्हाळ्यात दह्याऐवजी ताक (मठ्ठा) पिणं अधिक फायदेशीर मानलं जातं, कारण ताक थंड असून पचनाला हलकं असतं. हिवाळ्यात मात्र थोडं उष्ण परिणाम असलेलं दही योग्य प्रमाणात खाल्लं जाऊ शकतं. दही खाण्याची पचनास मदत व्हावी यासाठी त्यात काळीमिरी किंवा आयुर्वेदात सांगितलेलं त्रिकूट चूर्ण (सुके आले, काळी मिरी, लांब मिरी) यांचं मिश्रण टाकावं. हे मिश्रण पचनक्रिया सुधारतं आणि कफ वाढू देत नाही. तसेच गोठवलेलं किंवा अनेक दिवस जुने दही टाळावं, त्याऐवजी ताजं बनवलेलं दहीच खावं, जे शरीरासाठी अधिक फायदेशीर मानले जाते.