Monsoon Food Tips: मुंबईसह बऱ्याच शहरांमध्ये पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. पाऊस उकाड्यापासून तर दिलासा देतोच, शिवाय सोबतच काही आजारही घेऊन येतो. वातावरण बदलामुळे शरीरावर वेगवेगळे प्रभाव बघायला मिळतात. अशात या दिवसांमध्ये आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. खाण्या-पिण्याच्या गोष्टींची योग्य निवड करावी लागते. उन्हाळ्यात लोक भरपूर दही खातात. पण अनेकांना असाही प्रश्न पडतो की, पावसाळ्यातही दही खावं की नाही? चला तर जाणून घेऊ यावर एक्सपर्ट काय सांगतात.
आयुर्वेदात आपल्या आहारासंबंधी अनेक गोष्टी सांगण्यात आलं आहे. आयुर्वेद सांगतं की, वेगवेगळ्या वातावरणात आहारही वेगळा असला पाहिजे. कधीही काहीही खाल्लं तर आरोग्यासंबंधी समस्यांचा धोका अधिक वाढतो. आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात पोटातील पचन अग्नि कमजोर होते. अशात आहारात बदल करणं गरजेचं असतं. अशात पावसाळ्यात दही खावं की नाही याबाबत आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पावसाळ्यात दही खावं की नाही?
डॉक्टर विलास शिंदे यांच्यानुसार, पावसाळ्यात दही खाणं टाळलं पाहिजे. या दिवसांमध्ये दही खाल्लं तर कफ तयार होतो, ज्यामुळे खोकला आणि सर्दी होते. सोबतच पचनक्रियाही योग्यप्रकारे होत नाही. पावसाळ्यात दही किंवा दह्याचे पदार्थ खाल्ले तर घशात खवखव होते. पोटात गडबड होते आणि तापही येऊ शकतो. डॉक्टर म्हणाले की, जर तुम्हाला या दिवसात दही खायचंय असेल तर त्यात साखर टाकून खावे. तसेच रात्री दही अजिबात खाऊ नये. असं केल्याने पोटासंबंधी समस्या होऊ शकतात.
पावसाळ्यात काय खावे?
आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी आलं, सूंठ, हींग, काळी मिरी पूट आणि गव्हाच्या चपात्या यांचं सेवन करावं. पावसाळ्यात शरीरातील दोष दूर करण्यासाठी चटकदार आणि गोड पदार्थ खावेत.