मुंबईत २० टक्के पाणी कपात मुंबईकरांनो, सांभाळून पाणी वापरा!
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30

मुंबईत २० टक्के पाणी कपात मुंबईकरांनो, सांभाळून पाणी वापरा!
>मुंबई : जुलै-ऑगस्ट महिन्यांत पावसाने दडी मारल्यामुळे भविष्यातील पाण्याच्या नियोजनासाठी मुंबईत २० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून ही पाणी कपात लागू झाली आहे. जोपर्यंत पुरेसा पाऊस पडणार नाही, तोपर्यंत पाणीकपात सुरु राहील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. व्यावसायिक कामासाठी वापरल्या जाणार्या पाण्यामध्ये ५० टक्के कपात करण्यात आली असून, पाण्याची कमतरता असल्याने मुंबईकरांनी सांभाळून पाणी वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.मुंबईला रोज ३ हजार ७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रत्यक्षात मुंबईकरांना ४ हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या जलस्त्रोतांमधील उपलब्ध जलसाठा हा २८ टक्के इतका कमी आहे. ३४० दिवसांसाठी लागणार्या पाणीसाठ्याऐवजी सध्या वैतरणात २२२ दिवस तर, भातसामध्ये १७४ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळ्यानंतर उपयुक्त पाणीसाठ्याची प्रत्यक्ष परिस्थिती ही १ ऑक्टोबरनंतर समजू शकेल. पण, सध्या पाणीसाठ्यातील तूट पाहून सुरक्षेचा उपाय म्हणून पावसाळ्यात २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करणार्या औद्योगिक आणि व्यापारी जलजोडणीधारक, जल तरण तलाव, मॉल्स, वातानुकुलित संयंत्रे, बाटली बंद पाणी, शीतपेय कारखाने तारांकित हॉटेल्स, रेसकोर्स इत्यादी ठिकाणी १०० मिलीमीटर अथवा त्यापेक्षा जास्त आकाराच्या जलजोडण्यांद्वारे होणार्या पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. ठाणे आणि भिवंडी येथील महानगरपालिका आणि नगरपालिकांना केल्या जाणार्या पाणीपुरवठ्यात २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. .........................(चौकट)विरोधक आक्रमकस्थायी समितीच्या बैठकीत २० टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र त्यावर चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी चर्चेला नकार दिल्याने विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला..........................१५ ते २० टक्के होते पाणी गळतीमुंबईत होणार्या पाणीपुरवठ्यापैकी १५ ते २० टक्के पाणी हे पाणीगळतीमुळे रोजच्या रोज वाया जाते. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारी गळती कमी करता आल्यास मुंबईकरांना मिळणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाचवता येईल. दोन वर्षांपूर्वी गळती रोखण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. १८ वॉर्डमध्ये ही यंत्रणा कार्यरत आहे. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत गळतीची ४१ हजार ४७१ ठिकाणे शोधण्यात आली. त्यापैकी ४१ हजार ४२६ ठिकाणी ही गळती थांबवण्यात आली आहे. .....................................सर्वांना पाणीपुरवठा करा! २००० साला नंतरची बांधकामे अनधिकृत असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. पण, ही बांधकामे तोडण्यात आलेली नाहीत. पण, त्यांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे झोपडपीभागात पाणी चोरीचे प्रमाण जास्त आहे. परिणामी दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत सर्वांना पाणी जोडणी द्या, याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव मंजूर झाला नव्हता. पाणीचोरीची प्रकरणे कमी करण्यासाठी हा एक उपाय असल्याने पुढच्या आठ ते पंधरा दिवसांत स्थायी समितीत हा प्रस्ताव पुन्हा मांडण्यात येईल, असे सुत्रांनी सांगितले...................................(तक्ता)पाण्याचा साठा जलस्त्रोत२६ ऑगस्ट १३२६ ऑगस्ट१४२६ ऑगस्ट१५मोडक सागर१२८९२५ १२७०५६११५७५६तानसा १४४२४०१४३५९३ ११२८४७विहार २७६९८ २६७८५ ११४२५तुळशी८०४६ ८०४६ ७६०९अप्पर वैतरणा२०७७६०१९४८५४१०६३५९भातसा६७२५९१६४२७०६४१७१५२मध्य वैतरणा६२३४५ १९३२१८ १९११९०एकूण १२५१६०५१३३६२५८९६२३३८(उपलब्ध पाण्याचा साठा द.ल.लि.)