Join us  

कल्याणचा नचिकेत लेले ठरला सारेगमपचा विजेता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 11:33 PM

मुंबई- मराठीतला गाजलेला रिअॅलिटी शो सारेगमपचा महाअंतिम सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मुंबई- मराठीतला गाजलेला रिअॅलिटी शो सारेगमपचा महाअंतिम सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या कार्यक्रमात कल्याणच्या नचिकेत लेलेनं दंगा घातला आहे. अनेकांना टक्कर देत कल्याणच्या नचिकेत लेलेनं बाजी मारली असून, सारेगमपचं विजेतेपद पटकावलं आहे.या कार्यक्रमात 36 प्रतिस्पर्धांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर महाअंतिम फेरीमध्ये 12 पंगेखोर पोहोचले होते. प्रेक्षकांची उत्कंठा शेवटच्या क्षणापर्यंत शिगेला पोहोचलेली होती. तसेच एक्झिट पोलनंही कार्यक्रमाला नवी झळाळी मिळवून दिली. रविवारच्या दुपारपासून या कार्यक्रमाची रंगत वाढत होती. स्पर्धकांमध्येही चढाओढ आणि ताणतणाव पाहायला मिळत होता. त्यानंतर अखेरच्या क्षणी कल्याणच्या नचिकेतनं बाजी मारली.तर यवतमाळची उज्ज्वला गजबळ ही दुसरी आली आहे आणि पुण्याच्या अक्षय घाणेकरनं तिसरा क्रमांक पटकावला आहे. विजेत्यांना 5 लाखांचं रुपयांचं बक्षीस आणि झी मराठी मालिकेचे शीर्षक गीत गाण्याची संधी मिळणार आहे. पुष्कर श्रोत्री, वैभव मांगले, मनवा नाईक, निलेश मोहरीर, हृषिकेश जोशी अशा मराठी कलाकारांनी महाअंतिम सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती.  

टॅग्स :कल्याण