Winner : फरहान साबिरने पटकावला ‘द व्हॉइस आॅफ इंडिया’चा किताब
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 21:00 IST
गायिकीवर आधारित असलेल्या रिअॅलिटी शो ‘द वॉइस आॅफ इंडिया’चा किताब गायक फरहान साबिर याने पटकाविला आहे. अतिशय अटीतटीच्या रंगलेल्या ...
Winner : फरहान साबिरने पटकावला ‘द व्हॉइस आॅफ इंडिया’चा किताब
गायिकीवर आधारित असलेल्या रिअॅलिटी शो ‘द वॉइस आॅफ इंडिया’चा किताब गायक फरहान साबिर याने पटकाविला आहे. अतिशय अटीतटीच्या रंगलेल्या या शोचा किताब कोण पटकावणार याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर तीन महिन्यांच्या कठोर मेहनतीच्या बळावर फरहान याने स्वत:ला सिद्ध करीत या किताबावर स्वत:चे नाव कोरले आहे. शोच्या फिनालेमध्ये परखजीत सिंह, नियम कानूनगो, फरहान साबिर आणि रसिका बोरकर यांच्यात जोरदार लढत रंगली होती. अभिनेत्री अनुष्का शर्माच्या उपस्थितीत रंगलेल्या या फिनालेमध्ये सर्व स्पर्धकांनी सर्वोत्तम परफॉर्मन्स करीत अखेरपर्यंत शोमध्ये चुरस कायम ठेवली. अनुष्का तिच्या आगामी ‘फिलौरी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये पोहचली होती. अतिशय अटीतटीच्या या सामन्यात फरहान याने आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स देत प्रेक्षकांची मने जिंकली. फरहानला जेव्हा विजेता म्हणून घोषित करण्यात आले होते, तेव्हा त्याच्याकडे आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. यावेळी फरहानने म्हटले की, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मी कठोर मेहनत करणार आहे. यावेळी त्याने शोचे आणि जेजेस्चे आभार मानले. फरहान गायक शान याच्या टीममध्ये होता. त्यामुळे त्याने या यशाचे संपूर्ण श्रेय शान याला दिले. यावेळी फरहानने म्हटले की, शान यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळेच मी यश गाठू शकलो. शोचे जज म्हणून शान याच्यासह नीती मोहन, सलीम मर्चेंट, बेनी दयाल यांनी काम पाहिले होते. विजेत्या फरहानला २५ लाखांचे बक्षीस देण्यात आले. त्याचबरोबर एक चारचाकीही बक्षीस म्हणून देण्यात आली. फरहानने युनिव्हर्सलबरोबर रेकॉर्डिंगची डिल केल्याचे सांगण्यात आले.