अक्षरा का झाली भावूक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2016 18:05 IST
गेल्या 8 वर्षापासून 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून हिना खान (अक्षरा)ने रसिकांचे मनोरजंन करणारी हिना खान (अक्षरा)ने मालिका ...
अक्षरा का झाली भावूक?
गेल्या 8 वर्षापासून 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून हिना खान (अक्षरा)ने रसिकांचे मनोरजंन करणारी हिना खान (अक्षरा)ने मालिका सोडल्याचे कळताच रसिकही नाराज झालेत.नुकताच अक्षराने मालिकेत भजन सिक्वेंस शूट केला.यावेळी मात्र अक्षराला तिचे आवडते भजन ''मधुर सुना दो कान्हा'' हे गात असताना तिला तिचे अश्रृ अनावर झाले होते. तिच्या एका चाहत्याने हा व्हिडीओही सोशल मिडियावर शेअर केलाय.मालिकेच्या सुरूवातीला नैतिक आणि अक्षराच्या लग्न होते आणि अक्षरा सासरी जाते तेव्हा ती तिथे हेच भजन गात सा-यांची मनं जिंकते असे दाखवण्यात आले होते. खरेतर तेव्हापासून ऑनस्क्रीन आदर्श सूनेचा तिचा प्रवास सुरू झाला होता.त्यामुळेच जेव्हा तिला पुन्हा एकदा तिच्या जुन्या आठवणी आटवतचा गहिवरून आले होते.