'येऊ कशी तशी मी नांदायला' (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत दाखवण्यात आलेली एक आगळी वेगळी कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. स्वीटू आणि ओमची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. मालविकाने अनेक अडथळे आणल्यानंतरही ओम आणि स्वीटू यांचे लग्न झालेले पाहून प्रेक्षक सुखावले होते. मात्र लोकमतच्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार ओम आणि स्विटूची येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. या जागी स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची नवी मालिका तु तेव्हा तशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
येऊ कशी तशी मी नांदायला मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेत चिन्या आणि किंजलचा साखरपुडा ठरला आहे. तो साखरपुड्याचे आमंत्रण द्यायला स्वीटूच्या सासरी जातो. तसेच स्वीटूची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत असते. त्यामुळे शकूला तिला काहीतरी मोठे वाण द्यायचे असते. त्यामुळे खानविलकर घराण्याचा नेकलेस स्वीटूला देणार असते. मात्र तो नेकलेस मालविका मागते. त्यामुळे शकू तो तिला देते. त्यानंतर मकरसंक्रांतीदरम्यान शकू स्वीटूला सांगते की मला तुला काहीतरी मोठे वाण द्यायचे आहे. त्यावर मालविका बोलते माझे हे घड्याळ दे. त्यावर स्वीटू बोलते की मी घड्याळ घालत नाही. मग मालविका म्हणते की, तिला घरातली वस्तू दे. तिला त्यात जास्त रस आहे. त्यावर शकू मालविकाला बोलते की तू बरोबर बोलते आहेस आणि घराच्या किल्ल्या शकू स्वीटूकडे देते. तिला म्हणते घराची संपूर्ण जबाबदारी आता मी तुझ्यावर सोपवते. त्यामुळे आता पुन्हा मालविकाचा जळफळाट होणार आहे. दरम्यान, येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मालिकेचा शेवट चिन्या आणि किंजलच्या लग्नाने होणार आहे.