'अधुरी एक कहाणी', 'काटा रुते कुणाला' या मराठी मालिकांमध्ये दिसलेली स्नेहा वाघ (Sneha Wagh) आठवतेय? काही मराठी मालिका केल्यानंतर ती हिंदीत गेली. गेल्याच वर्षी तिची 'नीरजा' ही मालिका संपली. त्याआधी तिने अनेक हिंदी मालिका केल्या. मात्र आता स्नेहा वृंदावनात रमली आहे. श्रीकृष्णाच्या भक्तीत ती तल्लीन झाली आहे. त्यामुळे ती केवळ कामासाठीच मुंबईत येते. एरवी ती वृंदावनातच स्थायिक झाली आहे. मुंबईत आता तिला करमत नाही असं ती म्हणाली आहे.
'मज्जा पिंक'ला दिलेल्या मुलाखतीत स्नेहा वाघ म्हणाली, "मला एक दिवस वृंदावनातून आमंत्रण आलं होतं. मी तिथे गेले आणि तीन दिवसात इतक्या गोष्टी घडल्या. मी जेव्हा परत आले तेव्हा मला मुंबई आपली वाटली नाही. माझं घर आपलं वाटलं नाही. बेडही आपला वाटला नाही. मला झोपता यायचं नाही. सकाळी ५ वाजता उठायचे आणि म्हणायचे की मी चुकीच्या जागेवर आले आहे. कारण वृंदावनला सकाळी ५ वाजता मंगला आरती होते. मी फोनवर मंगला आरती दिसतेय हे चेक करायचे. मला इकडे राहणं जमलंच नाही. कसेबसे १५ दिवस काढले."
"मग एक दिवस मी आईला म्हटलं की वृंदावनात एक उत्सव होतोय तर मी तिथे जाते. आईला वाटलं ही आठवडाभर जाईल आणि येईल. मी गेले आणि मी ३ महिने आलेच नाही. मी तिथे इतकी रमले की मला असं वाटायला लागलं की हेच आपलं आयुष्य आहे. मी जिथे राहते ती सगळी मोहमाया आहे. मला आजूबाजूची लोकंही फेक वाटायला लागली होती. मग मला मुंबईतील गणेशगल्लीमध्ये बाप्पााच्या पाद्यपूजनासाठी आमंत्रण आलं. त्यासाठी मी आले नाहीतर मी आलेच नसते."
Web Summary : Actress Sneha Wagh, known for Marathi and Hindi serials, now resides in Vrindavan, devoted to Lord Krishna. She feels disconnected from Mumbai, finding Vrindavan to be her true home and life's purpose, only returning for work.
Web Summary : मराठी और हिंदी धारावाहिकों में जानी जाने वाली अभिनेत्री स्नेहा वाघ अब वृंदावन में भगवान कृष्ण की भक्ति में लीन हैं। उन्हें मुंबई से नाता टूटा हुआ सा लगता है, वृंदावन को अपना सच्चा घर और जीवन का उद्देश्य मानती हैं, केवल काम के लिए ही लौटती हैं।