अश्विनी धीर यांच्या राजकीय विडंबनामध्ये राजीव निगम साकारणार प्रमुख भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 17:16 IST
स्टार प्लसवर लवकरच आपल्या प्रकारचा पहिलाच शो ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ची सुरूवात होत असून हा शो ...
अश्विनी धीर यांच्या राजकीय विडंबनामध्ये राजीव निगम साकारणार प्रमुख भूमिका
स्टार प्लसवर लवकरच आपल्या प्रकारचा पहिलाच शो ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ची सुरूवात होत असून हा शो आपल्याच मॅडकॅप जगातील एका भ्रष्ट आणि विनोदी राजकारण्याबद्दल आहे. विनोदी प्रकारातील दिग्गज अश्विनी धीर हे ह्या वाहिनीसोबत प्रेक्षकांसमोर ह्या शो च्या माध्यमातून राजकीय विडंबन सादर करणार आहेत. सामान्य माणसांच्या समस्यांकडे साधारणपणे कोणाचे लक्ष जात नाही, पण शोमधून त्यांना विनोदी पद्धतीने टिपण्यात आले आहे. कॉमेडियन राजीव निगम हे त्यांच्या दैनंदिन आयुष्यावरील विनोदांसाठी आणि सामान्य माणसाच्या वाट्याला येणाऱ्या समस्यांना विनोदी पद्धतीने माडण्यासाठी मानले जातात, ते ह्या शोमध्ये प्रमुख भूमिका निभावणार आहेत. राजीव अतिशय उत्साहाने म्हणाले, “होय मी ह्या शो चा हिस्सा आहे आणि प्रमुख भूमिका निभावणार आहे. मी अश्विनी धीर यांचा आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली आणि त्यांच्यासोबत काम करताना मी स्वतःला भाग्यवान समजतो.”टीव्हीवरील अनेक कॉमेडी शोजमध्ये राजीव यांनी काम केले असून ते ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ मध्ये भ्रष्ट राजकारणी नेत्याची भूमिका साकारतील. हा शो त्यांच्यावर आणि त्यांच्या परिवारावर आपले लक्ष केंद्रित करेल. टीव्ही आणि चित्रपट उद्योगात विनोदी प्रकारात आपल्या भरपूर काम केलेले दिग्दर्शक अश्विनी धीर यांचा हा शो प्रेक्षकांना गुदगुल्या करेल हे मात्र नक्की.