छोट्या पडद्यावरील नागार्जुन या मालिकेनं अल्पावधीत आपल्या वेगळ्या कथानकामुळं रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं.मात्र पडद्यामागे या मालिकेच्या सेटवर काही गोष्टी बिनसल्याचं चित्र आहे.कारण आता निकितीन धीरनं नागार्जुन मालिकेला सोडचिठ्ठी दिलीय.प्रॉडक्शन हाऊस आपल्या तारखांचा योग्य वापर करत नसल्याचा आरोप करत त्यानं मालिकेतून काढता पाय घेतलाय. तसंच करार करण्याआधी वर्णन केलेली व्यक्तीरेखा आणि सध्या सुरु असलेली व्यक्तीरेखा यांत फरक असल्याचंही त्यानं म्हटलंय.याआधी मालिकेतील अभिनेता नवाब शहा आणि अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांनीही आपल्या भूमिकांना न्याय मिळत नसल्याचं म्हटलं होतं.त्यामुळं नागार्जुनच्या सेटवर सारं काही आलबेल आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल.
निकीतीन धीरची ‘नागार्जुन’ला सोडचिठ्ठी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 13:51 IST