'सिया के राम' घेणार निरोप ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 12:09 IST
एक वर्षाहूनही अधिक काळ सूरू असलेली 'सिया के राम' ही मालिका आता रसिकांचा निरोप घेणार आहे. रामायणावर आधारित या ...
'सिया के राम' घेणार निरोप ?
एक वर्षाहूनही अधिक काळ सूरू असलेली 'सिया के राम' ही मालिका आता रसिकांचा निरोप घेणार आहे. रामायणावर आधारित या मालिकेत भव्य दिव्य सेटच पाहयला मिळाला. तसेच नवीन चेह-यांनाही संधी देण्यात आल्यामुळे तोच तो पणा मालिकेत नव्हता,सिनेमा प्रमाणे भासेल असे प्रक्षेपण केले गेले. रामायणवर आधारित ही एकच मालिका ब-याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर सुरू झाल्यामुळे रसिकांनीही मालिकेला पसंत केले. मात्र आता ही मालिका संपवण्याचा निर्णय मालिकेच्या टीमने घेतलाय. येत्या डिसेंबर महिन्या पर्यंत अनेक नव्या मालिका भेटीला येणार असल्यामुळे काही मालिका संपवण्याचा निर्णय चॅनलने घेतल्याचे कळतंय.