Manasi Kulkarni : मानसी कुलकर्णी (Manasi Kulkarni) हा मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. वेगवेगळ्या मालिकांमधून धाटणीच्या भूमिका साकारुन अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या अभिनेत्री स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळते आहे. या मालिकेमध्ये ती गायत्री प्रभू नावाची व्यक्तिरेखा साकारते आहे. मानसी कुलकर्णी तिच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखली जाते. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने सोशल मीडियाच्या वापराबद्दल आपलं मत मांजलं आहे.
अभिनेत्री मानसी कुलकर्णीने मराठी मनोरंजनविश्व ला दिलेल्या मुलाखतीत सोशल मीडियाबद्दल भाष्य केलं आहे. त्यादरम्यान बोलताना ती म्हणाली, "हल्ली लोकांना फक्त आपलं आयुष्य कसं चांगलं आहे हे दाखवायचं आहे. तर बघताना आपल्या हे लक्षात यायला पाहिजे की, आता आपण एखाद्या सेलिब्रिटीचं कुठल्या कॉन्टेंट क्रिएटरचं किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीची एक पोस्ट बघितली तर ती पोस्ट हे त्याचं अख्खं आयुष्य नाही आहे. तो फक्त त्यांच्या आयुष्यातील एक क्षण आहे. याच्याव्यतिरिक्त आपल्या आयुष्यात जसे चढ-उतार असतात तसे त्यांच्या आयुष्यातही चढ-उतार असतात. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. याचा उलट परिणाम होतो की ते बघून आपल्याला आणखी डिप्रेस फिल होतं. तर या गोष्टी कुठे थांबवायला हव्यात, याबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे."
त्यानंतर अभिनेत्री चाहत्यांना सल्ला देत म्हणाली, "या गोष्टी अगदी साध्या आहेत. हे बघून जर मला त्रास होतोय तर मी ते बघू हा सोपा उपाय आहे. पण ते आपल्याकडून होत नाही. आणि आपण डॉक्टरांकडे धाव घेतो हे मूर्खपणाचं लक्षण आहे. सोशल मीडियामुळे नकळपणे आपण एकमेकांशी तुलना करु लागलो आहोत. पण, हे सर्कल आहे, त्यावरील प्रत्येक गोष्ट मनाला लावून नाही घ्यायची. एक मनोरंजनाचा भाग म्हणून सोशल मीडियाकडे पाहिलं पाहिलं पाहिजे. त्याचा आपल्या आयुष्यावर कोणताही वाईट परिणाम होता कामा नये." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनाातील भावना व्यक्त केल्या.