Join us

इंडियन मद्रर्सनी मुलांच्या बाजूने उभे राहणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 10:55 IST

रोजच्या मालिका पाहणे हा प्रेक्षक वर्गाची आवड बनली आहे. त्यात मालिका या महिलांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. पण रोज त्याच ग्लॅमरस साडया, त्या भावनिक कथा असणाºया मालिकेपेक्षा ही वेगळी अशी लेक माझी लाडकी ही मालिका लवकरच भेटिला येत आहे. या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अशाच या सुंदर अभिनेत्रीशी लोकमत सीएनएक्सच्या डिजीटलच्या एडिटर जान्हवी सामंत यांनी साधलेला संवाद

रोजच्या मालिका पाहणे हा प्रेक्षक वर्गाची आवड बनली आहे. त्यात मालिका या महिलांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. पण रोज त्याच ग्लॅमरस साडया, त्या भावनिक कथा असणाºया मालिकेपेक्षा ही वेगळी अशी लेक माझी लाडकी ही मालिका लवकरच भेटिला येत आहे. या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अशाच या सुंदर अभिनेत्रीशी लोकमत सीएनएक्सच्या डिजीटलच्या एडिटर जान्हवी सामंत यांनी साधलेला संवाद१. आईची भूमिका ही तुम्ही कित्येक मालिकेतून पार पाडली आहे. पण ही भूमिका तुमच्यासाठी कशी वेगळी आहे- हो मला मान्य मी कित्येक मालिकेतून आईच्या भूमिका पार पाडल्या आहेत. पण लेक माझी लाडकी या मालिकेतील आईची भूमिका थोडी वेगळी आहे. या मालिकेतील आई खूप सशक्त व बिनधास्त आहे. आज आपण २१ व्या शतकात असताना देखील स्वत:च्या मुलीबद्दलचे निर्णय घेण्यास डगमगतो. तसेच तिच्या सासरच्यां व्यक्तींसमोर बोलण्यासदेखील घाबरतो. नेमकी याच भूमिकेच्या विरूद्ध माझी भूमिका आहे. या मालिकेतील मी पार पाडलेली आईची भूमिका  एकदम बिनधास्त आहे.  ती आपल्या मुलीच्या बाजूने नेहमी खंबीरपणे उभे राहत असते. ती आई कुणालाही न घाबरता मुलीच्या विरूद्ध लढणाºया सगळ््या गोष्टींचा सामना करते. भले ते तिच्या सासरचे कुटूंब जरी असो. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. २. रिअल लाइफमध्ये तुम्ही देखील एक आई आहात.जेणेकरून आजच्या तरूणांबाबत फारसे योग्य मत मिळत नाही. म्हणून एक आई म्हणून आजच्या तरूणांईसाठी काय महत्वाचे आणि काय आत्मसात करणे आवश्यक आहे. - सध्याची तरूणाई पाहता, ही मुले पाश्चिमात्य संस्कृतीचा पाठलाग करताना दिसत आहे. यामध्ये लिव्ह इन रिलेशनशीप, जलद घटस्फोट, डेटिंग करणे यासारख्या जीवनाच्या महत्वाच्या गोष्टींचा पटकन निर्णय घेताना दिसत आहे. तसेच या पाश्चिमात्य संस्कृतीचा परिणाम देखील आपण पाहत आहोत. त्यामुळे एक आई म्हणून मी एवढेच सांगू इच्छिते की, आजच्या मुलांनी नात्यांची मुल्ये व महत्व जोपासली पाहिजे. कारण कुटूंबप्रणाली ही आपल्या संस्कृतीचा एक मुख्य स्तंभ आहे. आपले विचार व संस्कृती जपणे हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे पालकांनीदेखील मुलांना योग्य शिक्षण व संस्कृती शिकविणे आवश्यक आहे.३. या मालिकेच्या शुटिंगला सुरूवात करून फक्त दोन आठवडे झाले आहे याबाबतचा आपला अनुभव कसा होता?- ही सांगायची घाई होईल पण या मालिकेत आम्ही सगळे एकमेकांना नवीन आहोत. कारण यापूर्वी देखील मी माझे पती अविनाश यांच्याव्यतिरिक्त कोणासोबत देखील काम केले नाही. तसेच लेक माझी लाडकी ही खरचं खूप छान टीम आहे. सर्व एकमेकांना समजून घेतात. त्याचबरोबर ब्रेकमध्येदेखील सगळे एकमेकांशी ओळख करून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक असतात. ४. शक्य तो सर्व मालिकेच्या कथाकथानक सारखे असतात, तरी ही तू तुझी भूमिका कशी सांभाळली व कसं वेगळपणं दाखविलं?- टेलिव्हिजन शोच का? आपले जीवन देखील असेच आहे. रोज जगण्यात तेच तेच रूटीन आणि संघर्ष असतात. तरी एक कलाकार म्हणून आपल्या भूमिकेतून नेहमीच काहीतरी प्रेक्षकांना वेगळेपणा देण्याचा प्रयत्न करत असते. पण प्रत्येक भूमिका या त्या त्या पात्रावर अवलंबून असतात. तरी त्या परिस्थितीच्या त्या भूमिकेला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न असतो. आणि या भूमिकेला यश मिळाले तर त्या प्रयत्नांचे समाधान मिळते. ५: तुला फक्त आईच्या भूमिका मिळतात याबद्दल काय वाटतं- आईच्या भूमिका करणं यात चूकीचं काय आहे असं मला वाटत नाही.  कारण  वयाच्या तिसाव्या वर्षी मला बेटिया या मालिकेतून पहिल्यांदा आईची करायला मिळाली होती. यामध्ये मला पाच मुले देखील दाखविली होती. त्यामुळे अशा भूमिका माझ्यासाठी कोणत्याही मालिकेत महत्वाची व मध्याची भूमिका असते. तसेच यासाठी मला चेहºयावर सुरकुत्या व पांढरे केस अशा प्रकारचा लूक चेंज करावा लागला नाही. पण या भूमिका मी खूप एन्जॉए करते.