Join us  

​तुम्हाला माहीत आहे का की नारायणी शास्त्रीचे लग्न झालेले आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 10:47 AM

नारायणी शास्त्री क्योंकी साँस भू कभी बहू थी या मालिकेमुळे नावारूपाला आली. या मालिकेसोबतच तिने कोई अपना सा, पिया ...

नारायणी शास्त्री क्योंकी साँस भू कभी बहू थी या मालिकेमुळे नावारूपाला आली. या मालिकेसोबतच तिने कोई अपना सा, पिया का घर, पिया रंगरेझ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. नारायणीने अनेक चित्रपटांमध्येदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.नारायणी शास्त्री तिच्या मालिकांपेक्षा नेहमीच तिच्या वैयक्तिक जीवनामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. गौरव चोप्रासोबतचे तिचे अफेअर तर प्रचंड गाजले होते. गौरव आणि तिचे ब्रेकअप झाल्यानंतर ते दोघे आजही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. गेल्या चार वर्षांपासून टोनी या लंडनस्थित व्यक्तीशी नारायणी नात्यात आहे. तिने ही गोष्ट मीडियासमोर कबूलदेखील केली होती. टोनी अनेक वर्षांपासून भारतातच काम करत आहे. टोनी आणि नारायणी नात्यात असले तरी त्यांनी लग्नाचा विचार केला नव्हता. दिवसातील अनेक तास आम्ही एकमेकांसोबतच घालवत असतो. त्यामुळे लग्न करण्याची गरजच आहे असे तिचे म्हणणे होते. पण तिने वर्षभरापूर्वीच टोनीसोबत लग्न केले असल्याची बातमी नुकतीच आली आहे आणि नारायणीनेच ही गोष्ट मीडियाला सांगितली आहे. याविषयी नारायणी सांगते, "टोनी नेहमीच मीडियापासून दूर राहाणे पसंत करतो. त्यामुळे आम्ही ही बातमी सगळ्यांपासून लपवून ठेवली. आपल्याला सतत एकमेकांसोबत राहायला आवडते तर आपण लग्न का करत नाही असा एकदा मी आणि टोनी विचार करत होतो आणि त्याच दिवशी आम्ही घरी रजिस्टार बोलावला आणि लग्न केले. मी लग्नात जीन्स आणि टी-शर्ट घातली होती. माझ्या लग्नाला केवळ माझी आई आणि माझे काही जवळचे मित्रमैत्रिणीच उपस्थित होते. माझे लग्न झाले असल्याचे इंडस्ट्रीतील काही लोकांना माहीत आहे आणि समोरून कोणी मला विचारलेच तर मी माझे लग्न झाले असल्याचे लगेचच मान्य करते."