करणने साधला फॅन्सशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 14:42 IST
ये कहा आगये हम ही मालिका लवकरच संपणार आहे. या मालिकेच्या टीमने नुकतेच मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण केले. या ...
करणने साधला फॅन्सशी संवाद
ये कहा आगये हम ही मालिका लवकरच संपणार आहे. या मालिकेच्या टीमने नुकतेच मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण केले. या मालिकेत करण कुंद्रा आणि सानवी तलवार प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेत प्रेक्षकांना एक सुंदर प्रेमकथा पाहायला मिळाली होती. पण नंतर या मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण देण्यात आले. या मालिकेत सुपरनॅचरल पॉवरसारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आला. त्यानंतर या मालिकेचा टीआरपी ढासळत गेला. या मालिकेचे चित्रीकरण संपल्यानंतर करणने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरून त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी त्याची प्रेयसी अनुष्का दांडेकरही उपस्थित होते.