Join us

फायनली चाहत्यांना दिला अक्षराने मोठा धक्का, या कारणामुळे अक्षराने मालिका सोडण्याचा घेतला निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 16:37 IST

सुपरहीट ठरलेली 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिका हळूहळू रसिकांना मोठा झटका देतेय. काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यासाठी ...

सुपरहीट ठरलेली 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिका हळूहळू रसिकांना मोठा झटका देतेय. काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यासाठी करण मेहरा (नैतिक) आणि  रोहन मेहरा (नक्ष )या दोघांनीही मालिका सोडली. या दोघानंतर हिना खान (अक्षरा)देखील ही मालिका सोडणार असल्याच्या फक्त चर्चाच रंगत होत्या. मात्र आता हिना खान(अक्षरा) ही मालिका सोडणार असल्याचे खुद्द अक्षरानेच सांगितले आहे. नोव्हेंबर महिण्यातच मालिकेचे  शेवटचे शूट ती करणार आहे. मालिकेत गाडी चालवताना तिचा अपघात होतो आणि या अपघातात तिचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. तोच ट्रॅक अक्षरासाठीही शेवटचा ठरणार आहे. त्यानंतर मालिकेत अक्षरा दिसणार नाही. याविषयी अक्षरा सांगते. की इतकी वर्ष एकच मालिकेतू रसिकांशी एक वेगळे नाते निर्माण झाले. माझ्यासाठी हा निर्णय घेणे खरेतर खूप कठिण होता. मात्र आयुष्यात कुठेतरी थांबाव लागतं त्याप्रमाणेच मी अक्षराला आता इथेच थाबवण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा थोडे पुढे जायचा विचार आहे. अक्षरा व्यतिरिक्त मी अजून काय करू शकते हे जाणून घ्यायचे आहे. पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीला येईल मात्र नेमकं कधी ते सांगु शकत नाही. आज खूप जड मनाने रसिकांना मला अलविदा बोलावं लागतंय.असे हिना अर्थात अक्षराने म्हटले आहे. याच महिन्यात तिचा शेवटचा सीन शूट करून ती लवकरच जयवंत जैयस्वालसह विवाहबंधनात अडकणार आहे.तिच्या लग्नाच्या तयारीलाही लागणार असल्याचे कळतंय . हिना खान अर्थात सा-यांची लाडकी बहू अक्षरा,अक्षरा आणि नैतिक या दोघांनी त्यांच्या रोमँटीक अंदाजाने रसिकांच्या मनात घर केले. या दोघांच्या केमिस्ट्रीला रसिकांनीही भरभरून दाद दिली. इतकच नाहीतर अक्षरा आणि नैतिक या जोडी प्रमाणेच आपले नाते घट्ट असावे असेही रसिकांनी त्यांच्या आयुष्यात आग्रह धरल्याचेही पाहायला मिळाले. अक्षराची प्रत्येक गोष्ट रसिकांनी आपलीशी केली. अक्षराची साडीची स्टाइल,अक्षराचे दागिने तिचे चाहतेही लग्न सोहळ्यात तशीच स्टाइल करायचे. अक्षराची क्रेझ बघता बघता अशी काय वाढली की 'अक्षरा'पॅटर्न साडी मार्केटमध्ये विकली जाऊ लागली.विशेष म्हणजे मालिकेत रंगणारा विवाह सोहळा असो किंवा बारसे रसिकांनी अगदी या ऑनस्क्रीन सोहळ्या प्रमाणेच त्यांचे सोहळे साजरे केले. विशेष म्हणजे या मालिकेचं संगीत, गाणी इतकी हिट झाली की लग्नसोहळ्यात होणा-या संगीत कार्यक्रमात याच मालिकेच्या गाण्यांवर अक्षराचे चाहते थिरकतातच. अक्षराने रसिकांवर अशी काय जादू केली की अक्षरा आता 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका सोडणार हे स्विकारणेच कठीण होईल. गेल्या 8 वर्षांपासून ये रिश्ता क्या केहलाता है मालिकेने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. मात्र सगळ्यात जास्त हिना खानने रंगवलेली अक्षरा ही प्रत्येकाला आपलीशी वाटू लागली. अक्षराचा अभिनय रसिकांना इतका  काही आवडू लागला की तिच्यामुळेच मालिका सर्वोत्कृष्ठ कौटुंबिक मालिकाही ठरली. आजही प्रत्येक सासू अक्षरा सारखीच सून मिळावी. याची प्रार्थना करत असते. इतके अक्षराला सा-यांनी भरभरून प्रेम दिलंय. मात्र आता मालिकेचा श्वास असणारी अक्षरानेच मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता अक्षराच्या भूमिकेसाठी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. वाचा : सोशल मिडियावर हिना खान ठरतेय चर्चेचा विषय