Join us

साक्षीदारांची मुंबई होऊ शकते हत्या, त्यांना सुरक्षा द्या- सुशांतच्या भावाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 16:48 IST

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होतायते.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होतायते. या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित साक्षीदार जे माध्यमांकडे येत आहेत आणि त्यांचे मुद्दे ठेवत आहेत, त्यांचीही येत्या काही दिवसात हत्या केली जाऊ शकते, अशी भीती  सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपा आमदार नीरज सिंह बबलू यांनी व्यक्त केली आहे. 

आजतकच्या रिपोर्टनुसार नीरज सिंग बबलू म्हणाले,सुशांतच्या प्रकरणात दररोज नवीन साक्षीदार येत आहेत जे नवीन तथ्य समोर आणत आहेत. अशा लोकांना आपली माहिती सीबीआयला ही द्यायची आहे. या अशा साक्षीदारांची हत्या होण्याची शक्यता आहे.”मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित करताना, अशी मागणी केली की सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील साक्षीदारांना मुंबई पोलीस  सुरक्षा का देत नाही? त्यांनी या साक्षीदारांना सुरक्षा पुरवण्यासाठी मुंबई पोलिसांना विनंती केली आहे.

नीरज सिंग म्हणाले, सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पुढे आलेल्या सर्व साक्षीदारांना त्वरित संरक्षण मिळावे अशी मी मुंबई पोलिसांना विनंती करतो. यासंबंधित पुराव्यांशी छेडछाड केली जाऊ नये जेणेकरुन जेव्हा सीबीआय या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी घेऊन पुढे जाईल, तेव्हा त्यांना साक्ष आणि पुरावे मिळतील. ”

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत