‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या आगामी चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, सुमारे ४०० कोटी रूपये खर्चून बनणा-या या चित्रपटाचे शूटींग तीन आठवड्यांसाठी थांबवण्यात आले आहे आणि याला कारण आहे, अभिनेता रामचरण.साऊथ सुपरस्टार चिरंजीवाचा मुलगा रामचरण तेजा यात लीड भूमिकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु होते. पण जिममध्ये वर्कआऊट करताना रामचरणच्या पायाच्या टाचेला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीनंतर डॉक्टरांनी रामचरणला तीन आठवड्यांची विश्रांती सांगितली. त्यामुळे या बिग बजेट सिनेमाचे शूटींग तूर्तास स्थगित करण्यात आले. रामचरण सेटवर परतला की, शूटींग पुन्हा एकदा सुरु होईल.
अभिनेता रामचरणमुळे तीन आठवड्यांसाठी थांबले ‘आरआरआर’चे शूटींग!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 13:37 IST
होय, सुमारे ४०० कोटी रूपये खर्चून बनणा-या ‘आरआरआर’ या चित्रपटाचे शूटींग तीन आठवड्यांसाठी थांबवण्यात आले आहे आणि याला कारण आहे, अभिनेता रामचरण.
अभिनेता रामचरणमुळे तीन आठवड्यांसाठी थांबले ‘आरआरआर’चे शूटींग!!
ठळक मुद्दे‘आरआरआर’ हा चित्रपट अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेला आहे.