Join us  

'तिथं जागा मिळवणं खूप अवघड होतं...', 'इंडियन आयडॉल' फेम अभिजीत सावंतचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:26 PM

1 / 13
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो इंडियन आयडॉलमुळे आजवर अनेक गायकांचे नशीब फळफळले आहे. या शोमधून बाहेर पडलेले स्पर्धक चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.
2 / 13
इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर्स आल्या होत्या. अभिजीत सावंतचे आयुष्य एका रात्रीत बदलले होते. मात्र नुकतेच एका मुलाखतीदरम्यान इंडियन आयडॉलचा विजेता झाल्यावर आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल त्याने सांगितले.
3 / 13
तसेच त्याने मी छोट्या कुटुंबातून असल्यामुळे मला तिथे जागा मिळवणे खूप अवघड होते, असा धक्कादायक खुलासा देखील केला.
4 / 13
बीबीसीच्या रिपोर्टनुसार अभिजीत सावंतने इंडियन आयडॉलचा विजेता झाल्यावर आयुष्य सोपे झाले का? असे विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला, मी इंडियन आयडलचा विजेता झाल्यानंतर अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांनी माझी स्तुती केली होती. ते ऐकून मी भारावून गेलो होतो. त्यावेळी लोकांकडून मिळालेलं प्रेम, आनंद यातून काही दिवसांनंतर सावरणे आवश्यक होते.
5 / 13
मी या इंडस्ट्रीतून गायब कधीच झालो नव्हतो. पण मी माझ्या डोक्यात हवा जाऊ दिली नाही, असेही तो म्हणाला.
6 / 13
तो पुढे म्हणाला की, इंडियन आयडलचा शो संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका मासिकाने त्यांच्या फ्रंट पेजवर मी शोमध्ये हेराफेरी केल्याची बातमी प्रसिद्ध केली. ती बातमी वाचल्यानंतर माझी ट्रेनिंग सुरु झाली होती.
7 / 13
इंडस्ट्रीत कसे राहायचे? निगेटिव्हिटीपासून स्वतःला लांब कसे करायचे हे मी त्यावेळी शिकलो. यानंतर काही दिवसांनी आणखी एक वृत्त प्रसिद्ध झाली. ज्या वृत्ताचे हेडिंग होतं, अभिजीत सावंत झाला बेघर.
8 / 13
तर दुसऱ्या एका बातमीत मला मुंबईच्या नव्हे तर दिल्लीच्या मुली आवडतात, असेही लिहिण्यात आले होते. यानंतर अजून एक विचित्र बातमी छापून आली होती.
9 / 13
अभिजीतने सांगितले की, मी मुंबईत एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्यावेळी मी सतत प्रवास करायचो. त्यामुळे मी जाड झालो होते. त्यात मी घट्ट असा टीशर्ट घातला होता. त्यात माझं पोट दिसत होतं. त्यावेळी तिथे माझा फोटो काढला आणि पेपरमध्ये छापला. त्याखाली मला याला यश पचलेले दिसत नाही, असे लिहिण्यात आले होते.
10 / 13
आताही रोज माझ्या वाचनात येते की मी कुठंतरी गायब झालो आहे, अशी खंत अभिजीत सावंतने बोलून दाखवली.
11 / 13
कार्यक्रम संपल्यानंतर अभिजीतला अनेक वाईट अनुभव आले. या वाईट अनुभवांविषयी तो म्हणाला, शो मोठा असल्यामुळे लोकांनी स्वतःचं स्वतःची मतं बनवली होती. जेव्हा शो सुरु होता तेव्हा आमच्यासोबत एक पीआर एजेंट होता. त्यावेळी आमच्याबद्दल चांगले लेख, बातम्या छापल्या जायच्या. पण जसं शो संपला आणि मी खऱ्या जगात आलो तेव्हा मात्र मीडिया आणि लोक फार बदलले होते.
12 / 13
एकदिवस मी माझ्या पीआर एजेंटला फोन केला. त्यावेळी आमची छान मैत्री झाली होती. पण तेव्हा तो फोनवर माझ्याशी नीट बोललाच नाही. त्याने मला याच्याशी बोल, त्याच्याशी बोल असे सांगितले. थोडक्यात तुझे तू बघ असे त्याला म्हणायचे होते.
13 / 13
तेव्हा मला समजले की आपण ज्या पद्धतीने विचार करतो, त्या पद्धतीने जग चालत नाही. मी छोट्या कुटुंबातून असल्यामुळे मला तिथे जागा मिळवणे खूप अवघड होते, असा खुलासा अभिजीत सावंतने या मुलाखतीत केला.
टॅग्स :अभिजीत सावंतइंडियन आयडॉल