अचानक बॉलिवूडमधून गायब झाली Rimi Sen ?काय होतं त्यामागचं कारण? By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 7:28 PM1 / 10'हंगामा' हा तिचा पहिला चित्रपट. अक्षय खन्ना, आफताब आणि रिमी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या विनोदी चित्रपटाने चांगलं यश मिळवलं. 2 / 10यानंतर दिवाने हुए पागल, क्युंकी, गरम मसाला, धूम, फिर हेरा फेरी, गोलमाल अनलिमिटेड या चित्रपटातही तिने लहानमोठ्या भूमिका साकारल्या. 3 / 10रिमीने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमे केले आहेत. काही मोजके सिनेमांचा अपवाद वगळता तिला बॉलीवुडमध्ये फारसं यश मिळालं नाही.4 / 10 रिमीकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं गेलं आणि त्याप्रकारच्या भूमिका तिला मिळत गेल्या.5 / 10यापैकी बहुतांशी भूमिका बोल्ड होत्या. मात्र पुढच्या काळात रिमीला एकाच प्रकारच्या, एकाच धाटणीच्या भूमिका मिळू लागल्या. 6 / 10त्यामुळे एकाच पठडीतील भूमिका साकारल्याने रिमी कंटाळली. अशाप्रकारच्या भूमिका न साकारण्याचा निर्णय तिने घेतला.7 / 10हाच निर्णय तिला भारी पडला आणि रिमीच्या अभिनय कारकिर्दीला पूर्णविराम मिळाला. यानंतर तिने निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.8 / 10 बॉलीवुडच्या सिनेमात काम करताना फार मजा आली नसल्याचं रिमीला वाटतं. गेल्या काही वर्षांपासून ती लाईमलाइटपासून दूरच राहणे पसंत करते.9 / 10स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस तिने स्थापन केलं. २०१५ साली रिमीची निर्मिती असलेल्या बुधिया सिंह- बॉर्न टू लर्न या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. 10 / 10एक अभिनेत्री म्हणून जीवनातला एक निर्णय चुकला आणि करिअर संपुष्टात आले अशी कबुली रिमीने एका मुलाखतीत दिली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications