By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 14:51 IST
1 / 6दिल्ली ही देशाची आर्थिक राजधानी असली तरी इथे मुलींना आजही सुरक्षित वाटत नाही. निर्भया केसमुळे तर दिल्ली हादरुन निघाली होती. अनेक मुलींना या शहरात वाईट अनुभव आला आहे.एका अभिनेत्रीनेही मुलाखतीत तिला आलेला धक्कादायक अनुभव सांगितला.2 / 6हिंदी फिल्म इंडस्ट्रीतली प्रतिभावान अभिनेत्री तिलोत्तमा शोम (Tillotama Shome). 'लस्ट स्टोरीज 2','सर' आणि आता नुकताच आलेला 'त्रिभुवन मिश्रा CA टॉपर' या सिनेमांमध्ये तिच्या भूमिकेचं कौतुक झालं आहे. याशिवाय ती 'दिल्ली क्राइम' या गाजलेल्या वेबसीरिजमध्येही होती. 3 / 6'हार्टफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत तिलोत्तमा शोमने दिल्लीतला भयानक अनुभव सांगितला. ती म्हणाली, 'मी एकदा बसची वाट पाहत थांबले होते आणि अंधार व्हायला लागला होता. तेव्हाच ६ मुलं कारमधून उतरले आणि माझ्याजवळ येऊन थांबले. मी सुरुवातीला थोडी घाबरले आणि तिथून बाजूला सरकले. मात्र ते लोकांनी माझी छेड काढायला सुरुवात केली.'4 / 6त्यातल्या एकाने तर मला दगडही मारला. तेव्हा मी तिथून पळ काढला. पण ते कारमध्ये असल्याने सहज मला गाठू शकणार होते. म्हणून मी रस्त्याच्या मधोमध उभी राहिले आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना लिफ्ट मागत होते. बऱ्याच गाड्या न थांबताच पुढे जात होत्या.5 / 6तेवढ्यात मला एक कार दिसली ज्यावर मेडिकलचं प्लस साइन होतं. ते बघून ही कार डॉक्टरांची असेल आणि सुरक्षित असावी असं मला वाटलं. ती कार थांबली आणि मी समोरच्या सीटवर बसले. पण इथे तर वेगळाच अनुभव आला. ड्रायव्हरने त्याच्या पँटची झिप उघडली आणि बळजबरी त्याने माझा हात पकडला.6 / 6मी त्याला जोरात धक्का दिला. यामुळे त्याने कार थांबवली. तो मला बाहेर जा म्हणाला. तो भयानक प्रसंग मी कधीच विसरु शकणार नाही. दिल्ली ही मुलींसाठी नाही असंही ती यावेळी म्हणाली.