Join us

सलग १६ चित्रपट फ्लॉप, मिस इंडिया झालेली 'ही' अभिनेत्री लग्नानंतर कुठे झाली गायब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:43 IST

1 / 8
अभिनेत्री नम्रता शिरोडकर बॉलिवूडमधील एकेकाळीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. नम्रताने १९९३ मध्ये फेमिना मिस इंडियाचा खिताब जिंकला.
2 / 8
'वास्तव','पुकार','जब प्यार किसी से होता है' सारख्या सिनेमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री एकाएकी सिनेसृष्टीतून गायब झाली.
3 / 8
संजय दत्तसोबत 'वास्तव' सारखा सुपरहिट चित्रपट देणाऱ्या नम्रताने अनेक उत्तम कलाकृतींद्वारे आपले अभिनय कौशल्य दाखवत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
4 / 8
२००० मध्ये, नम्रता 'वामसी' हा तेलुगू चित्रपट करत होती. या चित्रपटाच्या सेटवर नम्रताची भेट महेश बाबू यांची पहिली भेट झाली. या भेटीचं रुपांतर मैत्री झालं आणि ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.
5 / 8
२००५ मध्ये नम्रता आणि महेश बाबू यांनी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने प्रेमासाठी तिच्या अभिनय क्षेत्राकडे पाठ फिरवली आणि ग्लॅमरच्या दुनियेपासून स्वतःला दूर केलं. आता नम्रता तिच्या कौटुंबिक जीवनात व्यस्त आहे. अभिनेत्रीला दोन मुलं आहेत.
6 / 8
नम्रता शिरोडकरने तिच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत मॉडेलिंगच्या जगात खूप नाव कमावलं.
7 / 8
१९९३ मध्ये सौंदर्य स्पर्धा फेमिना मिस इंडियाचा खिताब जिंकणारी अभिनेत्री नम्रताने १९९८ मध्ये आलेल्या 'मेरे दो अनमोल रतन' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
8 / 8
परंतु, प्रसिद्धीच्या शिखरावर, तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेत कुटुंबाला प्राधान्य द्यायचं ठरवलं. परंतु सलग १६ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिने अभिनयाला रामराम केला.
टॅग्स :नम्रता शिरोडकरमहेश बाबूबॉलिवूडसेलिब्रिटी